उरण : जुलैच्या मध्यावर उरण मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणी पुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागल आहे.  मात्र मागील पंधरा दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे उरणच्या रानसई धरणाची साठवणूक क्षमता जवळपास ४ दशलक्ष घन मीटरने कमी झाल्याने पाऊस सुरू राहिल्यास धरणातील पाणी साठा कायम राहण्यास मदत होते. मात्र पावसाचा खंड वाढल्यास पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होऊन उरणच्या नागरिकांना अधिकच्या पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? राज ठाकरे यांचा सवाल

Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
infrastructure growth slips in august
पायाभूत क्षेत्रांच्या वाढीला घरघर; साडेतीन वर्षात पहिल्यांदाच नकारात्मक; ऑगस्टमध्ये उणे १.८ टक्क्यांपर्यंत अधोगती
66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

यावर्षी १८ जुलैला रानसई धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मागील वर्षी रानसई १३ जुलै ला भरले होते. यावर्षी पाऊस उशिराने सुरू होऊन ही २०२२ च्या तुलनेत धरण भरण्यासाठी अधिकचा अवघ्या पाच दिवसाचा कालावधी लागला आहे. रानसई धरणातून उरण मधील औद्योगिक कारखान्यासह, येथील २५ पेक्षा अधिक ग्रामपंचायती व नगरपरिषद यांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र त्यासाठी लागणारा पाणीसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून येणारे उसणे पाणी घ्यावे लागत आहे. तर डिसेंबर किंवा जानेवारीतच आठवड्यातील दोन दिवसांची पाणी कपात ही करावी लागत आहे.

हेही वाचा >>> मिनी मंत्रालय कोकण भवन ; प्रवेश खाजगी गाड्यांना बंद ,मात्र अन्यत्र कोठेही सोय नाही ….

उरण मधील पाणी पुरवठ्यासाठी दररोज ४० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणाची साठवणूक क्षमता ही १० दशलक्ष घन मीटर वरून ७ दशलक्ष घन मीटर वर आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागला आहे. पावसाळ्यात नोव्हेंबर पर्यंत पाणी नियमितपणे पुरवता येते मात्र त्यानंतर पाणी कपात करावी लागत आहे. यामध्ये आठवड्यातील दोन ऐवजी तीन दिवसांच्या कपातीचा सामना उरणच्या नागरिकांना करावा लागला होता. उरण मध्ये ३ ऑगस्ट पासून सलग पंधरा दिवसांचा पावसात खंड पडला आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना पाणी चिंतेत वाढ झाली आहे. पावसात खंड पडला असला तरी रानसई धरणाच्या पाणी पातळी कमी झालेली नसल्याने पाणी पुरवठा सुरळीत व नियमित सुरू असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.