महाराष्ट्र शासनाच्यावतीने २००२-०३ पासून संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबवले जात असून राज्यात मागील अनेक वर्षे सातत्याने स्वच्छतेमध्ये नेहमीच नवी मुंबई शहर सर्वप्रथम क्रमांकावर राहीले आहे. २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यात अव्वल आणि देशात तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई शहर मानांकित आहे. एकीकडे देशात सातत्याने गौरवल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहर व महापालिकेच्या कामाचे सातत्याने कौतुक केले जाते. तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांना यंदा राज्यात पहिला व देशात ३ रा क्रमांक टिकवून ठेवणे किंवा दुसऱ्या वरच्या क्रमांक पटकावणे आव्हानात्मक आहे. एकीकडे नवी मुंबई शहरातील स्वच्छतेमुळे एकंदारीतच शहर स्वच्छ असले तरी शहरातील दिघा ते बेलापूरपर्यंत शहरातील विविध चौक, वाहतूक बेट असलेल्या ठिकाणी शहराचे सौदर्य वाढवणारी व लक्षवेधक ठरणारी शिल्पे मात्र धुळीने माखलेली आहेत. त्यामुळे याबाबातही पालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची व शिल्पांची स्वच्छताही ठेवण्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा