उरण : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबई ने थेट कोकणाला जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपुजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हे ही वाचा…एपीएमसी प्रवेशद्वारावर फास्टॅग प्रणाली
३ हजार ५७ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. करंजा येथील द्रोणागिरी मंदिराच्या भक्त भवनात या दुरदृश्य प्रणालीने येथील स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मुंबईतील सागरी सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे.
First published on: 13-10-2024 at 19:21 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde inaugurated marine highway bridge connecting karanja uran to revas alibag sud 02