उरण : जल प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या करंजा-रेवस व मोरा- मुंबई हे दोन्ही मार्ग अर्धवट आहेत. त्यामुळे उरणला जोडणारे जलमार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवासी करीत आहेत. करंजा-रेवस मार्गावरील करंजा जेट्टी तयार होऊनही सुरू न झाल्याने जेट्टीची दुरवस्था सुरू झाली आहे. २५ कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यात आलेल्या या जेट्टीवरील विजेचे खांब कोसळू लागले आहेत. तर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कठडे तुटून पडू लागले आहेत. तर जेट्टीच्या बीमना गंज चढू लागला आहे. तर पायऱ्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का व उरणच्या करंजा आणि अलिबागच्या रेवस या उरणला जोडणाऱ्या शंभर कोटींच्या दोन्ही जलमार्गावरील रो रो जलसेवेचे काम रखडले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून या मार्गावरील काम अपूर्णच आहे. यामध्ये मोरा जेट्टी ७५ कोटींची तर करंजा रेवस २५ कोटींचे काम आहे. या मार्गावरील कामाच्या दिरंगाईमुळे खर्चात ही वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मोरा जेट्टीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. मात्र असे असले तरी लवकरच या रो- रोच्या कामाला सुरुवात करून २०२५ च्या निश्चित वेळी मार्ग सुरू होईल असा दावा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Vande Bharat pune, special train pune, pune train,
पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Margaon to Panvel special trains for return journey to Konkankars Mumbai news
मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या, परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Nashik, Change traffic route Nashik,
नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

हेही वाचा…अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास मंदगतीने

उरणमधील नागरिकांसाठी आपल्या खाजगी वाहनांसह मुंबईत ये-जा करता यावे याकरिता मोरा ते मुंबई व करंजा रेवस रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जलसेवेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जलमार्गाचे काम अनेक वर्षे रखडल्याने या कामाचा अंदाजित ५० कोटींचा खर्च वाढून ७५ कोटींवर पोहचला आहे.

मोरा पोलीस ठाणेनजीक जेट्टीचे काम सुरू असून दगडांचा भराव करून जेट्टी बांधण्यात येत आहे. उरणवरून मुंबईत ये जा करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या रो रो जेट्टीच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

हेही वाचा…विजय चौगुलेंचे गणेश नाईक यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू

उरणकरांसाठी वाहनासह जलप्रवासाचा उत्तम पर्याय

उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना आपलं चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे. त्यामुळे वाहनासह उत्तम प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे उरण व अलिबाग या दोन तालुक्यांदरम्यान दोन किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोट्या बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली. त्यानुसार २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो रोची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंतर कमी होणार

या रो रो सेवेमुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील ५० किलोमीटरपेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे.

हेही वाचा…वाशीतील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित

प्रवासी संख्या वाढली

उरणमधील वाढते उद्याोग आणि नवी मुंबईच्या जवळ असणारे शहर म्हणून तसेच उरणमधून नव्याने लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व शिक्षण यानिमित्ताने उरण ते अलिबागदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.