पनवेल: बेलापूर ते पेणधर या मार्गिकेवर नवी मुंबई मेट्रो रेल्वेचा प्रवास उदघाटनाअभावी सूरु न होऊ शकल्याने राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने सामान्य प्रवाशांसाठी लवकर उदघाटन करा अन्यथा आम्ही मेट्रोचे उदघाटन करु असा इशारा दिला आहे. पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी एक लेखी पत्र काढून हा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड आरक्षणाचा दसऱ्याचा मुहूर्त सरला; आता भूखंड निश्चिती आणि नामफलकाची प्रकल्पग्रस्तांना प्रतिक्षा

maharashtra govt announces key decisions ahead of elections 40000 crore for key projects in mumbai and thane
मुंबई, ठाणेकरांना टोलचा आणखी भुर्दंड; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर ४० हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bhayander Metro, Kashigaon Station,
भाईंदर मेट्रोला विलंब होणार ? काशिगाव स्थानाकाच्या जागेअभावी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता
Nagpur, CCTV , Nagpur police, CCTV cameras Nagpur,
नागपूर : हजारो सीसीटीव्ही कॅमेरे ठरले ‘पांढरा हत्ती’, पोलीस तपासात अडचणी
The developer for the Municipal Corporation project to withdraw the redevelopment of Kamathipura from MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’कडून काढून घेण्याच्या हालचाली; विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय?
150 crore rupees sanctioned from Maharashtra shelter fund for 66 buildings
मुंबई : पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील ६६ इमारतींचा पुनर्विकास लांबणीवर! दुरुस्तीसाठी अखेर दीडशे कोटी!
Only 46 percent of the Kalwa Airoli Elevated Project has been completed in seven and a half years
साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्केच काम; भूसंपादन, पुनर्वसन प्रक्रियेतील संथगतीचा फटका
Kalwa-Airoli Project, Mumbai, Kalwa-Airoli,
मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण

सिडको महामंडळाने मागील १० वर्षापासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातून प्रत्यक्ष प्रवास सूरु करण्याच्या अनेक तारखा जाहीर केल्या आहेत. मागील महिन्याभरापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाल्यावर या रेल्वेतून प्रवास करता येईल अशी अपेक्षा खारघर, तळोजा आणि बेलापूर वासियांना होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात या रेल्वेचे उदघाटन होऊ शकले नाही. अनेक अडचणींचा सामना हा प्रकल्प उभारण्यासाठी झाला आहे. सर्व कामे पुर्ण झाल्यावर उदघाटनासाठी मागील चार महिन्यापासून तारखांची जुळवाजुळव होत आहे. कॉंग्रेस पक्षाने  देशाच्या पंतप्रधानांना नवी मुंबईकरांसाठी सुलभ असणाऱ्या मेट्रोच्या लोकार्पणासाठी वेळ नसल्याचा आरोप केला आहे. बेलापूर ते पेणधर या मेट्रोमुळे सध्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या बसमधून प्रवास करणारे, तसेच प्रवासी इकोव्हॅनने प्रवास करणा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. थेट ४०  रुपयात तळोजा वसाहतीमधून बेलापूर स्थानकात जाता येणार आहे. पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे मेट्रोच्या लोकर्पणासाठी अनेक तारखा दिवसांदिवस वाढविल्या जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना मेट्रोच्या प्रकल्पाची सूरुवात झाली. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस सरकारने रोवल्याचे आठवण कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी केली आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अंतिम तयारीसाठी सिडको मंडळाने करोडो रुपये खर्च केला असल्याने पंतप्रधान येणार असल्याने हेलिपॅड तयार करून ठेवले आहे. तरीही मेट्रोचे उदघाटन न झाल्याने पनवेलच्या कॉंग्रेसने सामान्य प्रवाशांसाठी उदघाटन करु असा इशारा दिला.