नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झालेले बेदाणे लिलाव केंद्र, सुका मेवा बाजारपेठ वाढवली तर ती शेतकऱ्यांसहित इतर बाजार घटकांच्या हिताची ठरेल शिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जा मिळेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात पहिल्यांदाच बेदाणा लिलावकेंद्राचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ आधी  मुंबईमध्ये स्थित होती. कालांतराने बाजारपेठेचे व्यापकता वाढवण्यासाठी नवी मुंबईत स्थलांतर करण्यात आले, तेव्हापासून आतापर्यंत एपीएमसी बाजार समितीची वार्षिक उलाढाल वाढत आहे , असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. सुकामेव्याच्या माध्यमातून बेदाण्याला बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल. याकरिता सांगली, सोलापूर सहित आता शेतकऱ्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणे विक्रीसाठी आणण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या बाजारात सुक्यामेव्याची ३०० दुकाने आहेत, आता याठिकाणी बेदाण्याचे लिलावकेंद्र सुरू झाल्याने आणखी  दुकाने वाढतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis On Varsha Bungalow
Devendra Fadnavis : वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे?… फडणवीसांनी टाकला सगळ्या चर्चांवर पडदा
finance minister Nirmala Sitharaman
प्रतिशब्द : भरवसूली चोहिकडे!
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
Prime Minister Narendra Modi optimism before the budget
गरीब, मध्यमवर्गीयांवर लक्ष्मीची कृपा राहो! अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशावाद

हेही वाचा >>> नवी मुंबई : केळी महागली, निर्यात वाढली, उत्पादनातही घट; केळी दरात वाढ

शेतकऱ्यांना बेदाण्याला चांगलं हमीभाव मिळण्याची आशा

राज्यातून सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची उत्पादन घेतले जाते. शिवाय येथील शेतकरी त्यावर प्रक्रिया करून बेदाणे तयार करतात. या शेतकऱ्यांना सध्या सोलापूर आणि सांगली या ठिकाणी बेदण्याची थेट विक्री करण्याची मुभा होती. परंतु आज गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बेदाण्याचे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बेदाण्याच्या विक्रीसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात बेदाण्याला २०० रुपयापासून बोली लावण्यात आली ते अखेर ३५१ पर्यंत बोली लावली गेली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव केंद्र सुरू झाल्याने या ठिकाणी आमच्या मालाला योग्य दर मिळेल अशी अपेक्षा आहे, असे मत शेतकरी विशाल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

आम्हाला सोलापूर बाजारात बेदाण्याला २००-२७५रुपये बाजारभाव मिळतो. परंतु आज झालेल्या लिलावात ३५१ रुपये दर मिळाला आहे. यापुढेही  मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत बेदाण्याला योग्य बाजारभाव मिळेल अशी -आशा आहे.

-राहुल हरिदास पवार, पंढरपूर 

Story img Loader