नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते, परंतु शुक्रवारी घाऊक बाजारात कांदा वधारला आहे. प्रतिकिलो मागे दरात कमीत कमी ३ रु ते जास्तीत जास्त ५ रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजारात पावसामुळे आवक कमी झाली असून सर्वच बाजारात कांदा वधारला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एपीएमसीत कांद्याचे दर स्थिर होते. परंतू शुक्रवारी बाजारात आवक कमी असल्याने दरवाढ झाली आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात. पावसाळ्याआधी ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यांत आणि त्यांनंतर ही दर वधारतात. त्यामुळे पावसाळापूर्व तयारी म्हणून ठेवणीचे कांदे साठवणुक करण्यास सुरुवात होते.

Jio Launched affordable recharge Plan
Jio Affordable Plan : जिओने गुपचूप लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये महिनाभर वापरता येईल इंटरनेट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Alphonso Mangoes arrived in APMC market Navi Mumbai
एपीएमसीत हापूस दाखल
Jio Removed Three Value Recharge Plans With Limited Data See more Details
अरेरे यार हे काय झालं?? जिओने ‘हे’ ३ प्लॅन्स केले बंद; दरवाढीनंतर जिओचा युजर्सना आणखी एक धक्का
Nmmc chief dr kailas shinde warn builders over pollution
नियम मोडणाऱ्या बिल्डरांच्या परवानग्या रद्द; महापालिका प्रशासनाचा इशारा

हेही वाचा… बाजारात मक्याच्या हंगामाला विलंब

मात्र यंदा बाजारात अवकाळी पावसामुळे साठवणूकीचे कांदे भिजल्याने दर्जा घसरला होता. त्यामुळे मे महिन्यात ठेवणीतल्या कांदा खरेदीला ग्राहकांची मागणी रोडावली होती. एपीएमसीत शुक्रवारी ७८ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो ३ ते ५ रुपयांनी दरवाढ झाली असून सर्वात उच्चतम प्रतिचा कांदा आधी १३-१५रुपयांनी उपलब्ध आता १६-२० रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात शुक्रवारी कांद्याची आवक कमी झाली आहे, तसेच सर्वच बाजारात कांद्याचे दर वाढले असल्याने एपीएमसीत ही कांद्याची दरवाढ झाली आहे. – महेश राऊत, व्यापारी, कांदा बटाटा बाजार समिती

Story img Loader