उरण : जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेसाठी ई लाँच सुरू करण्यात येणार आहेत. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र येत्या आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. या लाँचमुळे तासाभराचा हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत वातानुकूलित ई स्पीड बोट मधून करता येणार आहे. त्यामुळे उरणकरांना गारेगार प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.

या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत. जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला. या लाँचचे उदघाटन केंद्रीय बंदर विभाग मंत्र्यांनी केले. मात्र त्यानंतर ही सेवा सुरू झालेली नाही. या प्रदूषण विरहित स्पीडबोटीमुळे २५ मिनिटांत प्रवाशांना जेएनपीए-मुंबई दरम्यान पोहचता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्स आदी कामगार प्रवास करतात. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरुन बोटी सुरू असतात.

जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याजागी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारला आहे. प्रदूषण विरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये-जा करण्यासाठी स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षाभरापूर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अंमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र तांत्रिक कारणाने ही सेवा लांबली आहे.

मात्र येत्या आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्यात येईल अशी माहिती जेएनपीएचे उप संरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा लांबणीवर पडली होती.

२५ मिनिटांत मुंबई

या प्रदूषण विरहित स्पीडबोटीमुळे २५ मिनिटांत प्रवाशांना जेएनपीए-मुंबई दरम्यान पोहचता येणार आहे. तासाभराचा हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत वातानुकूलित ई स्पीड बोट मधून करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत.