उरण : सोमवारी दिवसभर उरण शहर आणि ग्रामीण भागातही बारा तासाहून अधिक काळ वीज गायब होती. एकीकडे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण शहर आणि ग्रामीण भागात बहुतांशी परिसरात विजेचा नेहमीचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे महावितरण कंपनीच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पोलखोल झाली आहे.

हे ही वाचा… Badlapur School Crime Case Live Updates: भाजपाला धक्का; कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार?

मागील आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून विजेची आवश्यकता आहे. मात्र त्याचवेळी उरण तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. बोकडवीरा गावातील वीज अनेकदा वारंवार ये जा करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात महावितरणच्या उपअभियंत्यांना विचारणा केली असता झम्पर जात असल्याचे कारण त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी महावितरणच्या पनवेल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या स्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही.

यामध्ये सोमवारी उरण शहरातील आंनद नगर, बोरी आदी भागांत अनेक तास वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उरणमध्ये सध्या अनेक ठिकाणी उंच इमारती आहेत. या इमारतींच्या पायऱ्या चढ-उतार कराव्या लागला. त्याचप्रमाणे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याचीही तयारी सुरू आहे. मात्र वीज सातत्याने ये जा करीत असल्याने या तयारीवर परिणाम झाला आहे. गणपती कारखाने व व्यावसायिक यांनाही फटका बसत आहे. तालुक्यातील चिरनेरसह पूर्व विभागातील वीज कायमस्वरूपी खंडित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा… Badlapur sexual abuse case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन पूर्वनियोजित; पोलिसांची माहिती

उरणच्या मुख्य विद्याुतवाहिनीत बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उरण शहरातील वीज वारंवार खंडित होत असेल तर त्या संदर्भात दुरुस्ती करण्यात येईल. – संजय चाटे, अभियंता, महावितरण कंपनी, उरण

उरण शहर आणि ग्रामीण भागात बहुतांशी परिसरात विजेचा नेहमीचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे महावितरण कंपनीच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पोलखोल झाली आहे.

हे ही वाचा… Badlapur School Crime Case Live Updates: भाजपाला धक्का; कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार?

मागील आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून विजेची आवश्यकता आहे. मात्र त्याचवेळी उरण तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. बोकडवीरा गावातील वीज अनेकदा वारंवार ये जा करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात महावितरणच्या उपअभियंत्यांना विचारणा केली असता झम्पर जात असल्याचे कारण त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी महावितरणच्या पनवेल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या स्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही.

यामध्ये सोमवारी उरण शहरातील आंनद नगर, बोरी आदी भागांत अनेक तास वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उरणमध्ये सध्या अनेक ठिकाणी उंच इमारती आहेत. या इमारतींच्या पायऱ्या चढ-उतार कराव्या लागला. त्याचप्रमाणे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याचीही तयारी सुरू आहे. मात्र वीज सातत्याने ये जा करीत असल्याने या तयारीवर परिणाम झाला आहे. गणपती कारखाने व व्यावसायिक यांनाही फटका बसत आहे. तालुक्यातील चिरनेरसह पूर्व विभागातील वीज कायमस्वरूपी खंडित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा… Badlapur sexual abuse case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन पूर्वनियोजित; पोलिसांची माहिती

उरणच्या मुख्य विद्याुतवाहिनीत बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उरण शहरातील वीज वारंवार खंडित होत असेल तर त्या संदर्भात दुरुस्ती करण्यात येईल. – संजय चाटे, अभियंता, महावितरण कंपनी, उरण