उरण : या वर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी भातपिकाच्या पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत उरण तालुक्यात अवघ्या ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पेरणीनंतर आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना शेती उपयुक्त पावसाच्या आगमनाची आस लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : मोरबे धरणात ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा!

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
One and a half crore compensation to ONGC oil spill victims
उरण : ओएनजीसी’च्या तेलगळतीग्रस्तांना दीड कोटींची नुकसानभरपाई
Smuggled goods in closed boxes of import and export stock of cigarettes worth ten crores seized again on Monday
आयात-निर्यातीच्या बंद खोक्यांत तस्करीचा माल, सोमवारी पुन्हा दहा कोटींच्या सिगारेटचा साठा जप्त
Slab Collapse, Slab Collapse at Mumbai APMC Headquarters in Vashi, Issue of Dangerous Buildings in Vashi apmc, mumbai Agricultural Produce Market Committee,
नवी मुंबई : एपीएमसी’च्या सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला
Water storage in Morbe dam is sufficient for 38 days
नवी मुंबई : मोरबे धरणात ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Police recruitment in Navi Mumbai postponed by two days
नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली
Devendra Fadnavis and Eknath shinde
लोकसभेतील पराभवानंतर महायुतीचा मोठा निर्णय, राज्य सरकारच्या ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाला स्थगिती!

उरण तालुक्यातील पूर्व तसेच पश्चिम विभागातील काही गावांतच शेती शिल्लक राहिली आहे. यामध्ये विविध उद्याोगांसाठी संपादित जमिनी तसेच समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरल्याने नापिकी झालेल्या जमिनी वगळता उर्वरित शेतीवर पीक घेतले जात आहे. मात्र अनेक वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या तुलनेने लाभ होत नाही. असे असतानाही कित्येक शेतकरी कुटुंबे ही निष्ठेने शेती करीत आहेत.