नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्याचा निर्णय २२ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. मागील काही वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या गावांना पुन्हा नवी मुंबईत सामावून घेण्याची उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर या १४ गावांमधील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु गावे नवी मुंबई पालिकेत सामावून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार याची प्रतीक्षा या गावकऱ्यांना होती. परंतु, आता ही गावे व त्यासंबंधीच्या कामकाजाची जबाबदारी पालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्यावर सोपवण्यात आली आहे.

पालिका आयुक्त शिंदे यांनी आदेश जारी करत कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांच्याकडे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट १४ महसुली गावांसंबंधी कामकाज पाहण्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. लवकरच या १४ गावांच्या मालमत्ता हस्तांतरण कामाला सुरुवात होणार आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिकेत ही गावे सामावून घेण्यासाठी नवी मुंबईतील काही नेत्यांचा याला विरोध होता. ही गावे सामावून घेताना खर्चाचा मोठा भुर्दंड पालिकेवर पडणार असून त्या मोबदल्यात शासनाने महापालिकेला आर्थिक निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता नव्याने येणाऱ्या गावांबाबत पालिका अधिकारी यांना मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे.

Dangerous schools of Raigad Zilla Parishad continue
रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Ganesh Naik aggressive in meeting with commissioner regarding 14 villages excluded from NMMC
“चौदा गावांसाठी एक रुपयाही खर्च नको”, आयुक्तांसमवेतच्या बैठकीत गणेश नाईक आक्रमक
A case has been filed against 15 people including an official employee contractor in the case of embezzlement in Malegaon Municipal nashikS
मालेगाव मनपातील अपहार प्रकरणी अधिकारी-कर्मचारी, ठेकेदारासह १५ जणांविरुध्द गुन्हा – लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई
revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव
Yavatmal, mukhyamantri ladki bahin yojana, Women Protest Erupts in cm shinde speech, women s empowerment, protest, rain, chaos
मुख्यमंत्र्यांनी ‘खात्यात पैसे आले का’ विचारताच महिलांचा गोंधळ…अखेर भाषण थांबवून….
Nagpur st employees marathi news
एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर… कृती समिती काय म्हणते…
Thane, Badlapur, Shambhuraj Desai,Investigation into Violent Badlapur Railway Protest, railway protest,
बदलापुरातील रेल रोको आंदोलनाची चौकशी केली जाणार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

हेही वाचा – फ्लेमिंगो अधिवास, कांदळवन संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश

हेही वाचा – नवी मुंबई : महामार्गावर खड्ड्यांचा ताप; शीव-पनवेल मार्गावर तुर्भे, वाशी उड्डाणपुलांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

आगामी काळात नव्या गावांच्या समावेशामुळे आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय गणितेही बदलणार असल्याची चर्चा रंगणार आहे. याबाबत पालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.