उरण : होळी व धुळवडच्या निमित्ताने खवय्ये मासळीला पसंती देतात. मात्र या वर्षी मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आवक घटल्याने मासळी महाग झाली आहे. पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते १२०० रुपयांवर पोहचले आहेत.

मासळीचे घटते प्रमाण, सातत्याने वातावरणातील बदल, शासनाच्या जाचक अटी, मच्छीमारांचे रखडलेले अनुदान आदी कारणांमुळे मासळी आवक घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

youth of thane addicted to drugs school students soft target for drug peddlers
ठाणे : लक्ष्य शाळकरी मुले!
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : जीएसटी कक्षेत आणल्यास इंधन स्वस्त होईल
Direct tax collection increased by 21 percent to Rs 4 62 lakh crore
प्रत्यक्ष कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ४.६२ लाख कोटींवर
Pimpri, pimpri chinchwad municipal corporation, half of the property owners pay taxes in pimpri, property tax, 362 crore collected property tax, 30 June Deadline to pay property tax, pimpri news,
पिंपरीत निम्म्या मालमत्ताधारकांकडूनच करभरणा, आतापर्यंत ३६२ कोटी जमा; ३० जूनपर्यंत मुदत
handloom industry
सांगली: मंदीमुळे आठवड्यात तीन दिवस यंत्रमाग बंदचा विट्यात निर्णय
number of malaria patients increased in Gadchiroli Health Department asked ICMR for research
गडचिरोलीतील हिवतापाचे ‘गूढ’! आरोग्य विभागाचे अखेर ‘आयसीएमआर’ला संशोधनासाठी साकडे
customs department seized 112 tonnes of betel nuts smuggled from united arab emirates
करचुकवेगिरीची सुपारी; दहा दिवसांत १५ कोटींचा ऐवज जप्त
An increase in the price of tomatoes Retail at Rs 80 per kg
टोमॅटोच्या दरात वाढ; किरकोळीत प्रतिकिलो ८०रुपयांवर

होळी आणि धुळवडीच्या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक एकत्र येतात. या दिवशी मटण, मासे याला मागणी असते. समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून आपल्या आवडत्या मासळीचा आस्वाद घेतला जातो. समुद्र किनाऱ्यालगत तसेच शेजारील शहरात राहणाऱ्या नागरिकांकडूनही मासळीचा आस्वाद घेतला जातो. मात्र यावर्षी त्यांना मासळीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. ४०० ते ६०० रूपये किलो असलेल्या कोळंबीचा दर एक हजार रुपये.  सुरमई व पापलेट ६०० ते ७०० रुपयांवरून  १२०० रुपयांवर पोहचला आहे. 

सध्या मासळीचा मोठा हंगाम नाही. त्यात होळीसाठी बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे मासळीच्या प्रमाणात घट झाल्याने दरात वाढ झाली आहे. साध्या मासळीवर समाधान मानावे लागत आहे. होळीनंतरच आवक वाढ होण्याची शक्यता आहे.सुधीर पाटील, मच्छीमार