लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : बुधवारी १०.३० वाजता उरण- पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानका नजीक एका चारचाकीसह,रिक्षा,आणि दोन दुचाकी आशा चार वाहनांचा एकत्रित अपघात झाला आहे. यामध्ये चार जण जखमी आहेत. या अपघातात दोन दुचाकी,क्रेटा चारचाकी वाहन व रिक्षाचे नुकसान झाले आहे. यातील रिक्षा अपघात होताच पलटी होऊन रस्त्याखाली कोसळली. अपघात नंतर जखमींना नागरिकांनी रुग्णालयात हलविले आहे. अपघात कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलीस आणि वाहतूक कर्मचारी घटनास्थळी आले.

person injured while tyring to alight from local traina at dombivli station
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमधून, रेल्वे मार्गात उतरताना प्रवासी जखमी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
vasai accident
वसई: महामार्गावरील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे सदोष काम, तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
Attack on passengers at Nagpur railway station Two killed and two injured
माथेफिरूचे भयंकर कृत्य… नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांवर हल्ला; दोन ठार, दोघे जखमी
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
Singapore Trains
Singapore Railway : सिंगापूरचं मुंबई: पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली; पण प्रवाशांसाठी ‘या’ सुविधाही पुरवल्या!
Mumbai Rain Update
Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं रुप, रेल्वेची उशिराने धाव, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी!
Iron barrier Dombivli railway station,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर लोखंडी रोधक, रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद

अपघाताचा मार्ग

रेल्वे स्थानका नजीक महिनाभरापूर्वी क्रेटा वाहनाने दुचाकी वरून जाणाऱ्या एका कुटुंबाला चिरडले होते. या अपघातात एका दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. या अपघाता नंतर त्या घटनेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

आणखी वाचा-मुंबईतील फलक दुर्घटना : पनवेल पालिका सतर्क, व्हीजेटीआयकडून स्ट्रक्चरल ऑडीट करून अहवाल देण्याबाबत पालिकेची नोटीस

वेगमर्यादा हवी

हा उरण शहराला जोडणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे कायमस्वरूपी व्यस्त असलेल्या मार्गा पैकी एक आहे. मात्र या मार्गावरील चारचाकी वाहनांसह इतर वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेण्यासाठी यंत्रणा न राबविल्यास आशा प्रकारच्या अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.