लोकसत्ता टीम

पनवेल : पनवेल बस आगारातून पेणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना प्रवाशाची ७० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. या चोरीची माहिती प्रवाशाला उशीराने समजली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. २५ एप्रीलला पनवेल ते पेण या पल्यावर ३६ वर्षीय विशाल पाटील हे एसटीने प्रवास करण्यासाठी पनवेल बस आगारात गेले होते. रात्री सव्वा सात वाजता विशाल आगारातील फलाट क्रमांक १ येथील पेण बसमध्ये चढताना विशाल यांची १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली.

pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Crime of theft, employee Spice Jet Airlines,
स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Pune Metro, Yerawada Station, Mahametro, train frequency, passenger services, Pimpri Chinchwad, District Court, Vanaz, Ramwadi,
पुणेकरांना खुशखबर! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
wagholi two wheelers set on fire marathi news
Pune Crime News: गांजा ओढणाऱ्या सराइतांना हटकल्याने दुचाकींची जाळपोळ
kalyan bus passenger looted marathi news
कल्याणमध्ये वाशी बसमध्ये चढताना तीन भामट्यांनी प्रवाशाला लुटले

महिना भरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर विशाल यांनी पोलीसांत तक्रार दिली. पनवेल शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिन्या भरापूर्वी शहरातील मिडलक्सास सोसायटीमध्ये एका घरात दोन महिलांनी घरात शिरुन चोरी केली होती. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सूमारास घरात सारे असताना या चोरट्या महिलांनी स्वतःकडे लहान बाळ घेऊन घरात प्रवेश केला. घरातील सर्व सदस्य कामात गुंतले असताना ही चोरी सकाळच्या सूमारास झाली होती. या घरातून ७७ हजार रुपयांचे मोबाईल या महिलांनी चोरले होते.

आणखी वाचा-सट्टा बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ७ लाखांची फसवणूक 

या घटनेनंतर पनवेल शहर पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. निवडणूकीच्या बंदोबस्तामुळे ताणाखाली असणाऱ्या पोलीसांना शालेय सुट्यांमुळे अनेक नागरिक घरांना कुलूप लावून पर्यटनासाठी बाहेर जात असल्याने पोलीसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.