नवी मुंबई: एकही आमदार अपात्र ठरणार नसून, सरकार पडणार नाही असा ठाम विश्वावर आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे पक्षाच्या आढावा बैठकी निमित्त ते आले असता त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षावरही टिकास्त्र सोडले.

नवी मुंबई प्रहार संघटनेची आढावा बैठक आज नेरुळ येथे पार पडली. याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आगामी काळातील कामांबाबत मार्गदर्शन केले.  

Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
Home Minister Amit Shah claims that there is no Article 370 in Kashmir again
काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! गृहमंत्री अमित शहा यांचा दावा; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Devendra Fadnavi
सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत म्हणाले…
eknath shinde, Pratap Sarnaik,
साहेब असा अंगठा दाखवून चालणार नाही, निधी द्यायलाच लागेल; आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांसमोरच निधीची मागणी
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”

आणखी वाचा-VIDEO: “केरळची सत्य परिस्थिती केरळची आहे, विदेशातून…”, आकडेवारी देत जितेंद्र आव्हाडांचं ‘द केरला स्टोरी’वर भाष्य, म्हणाले..

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षावरही टिका केली. “सध्या सभा सर्वत्र होत असून एकाने सभा घेतली की दुसरा घेतो. यातून लोकांना काय मिळते? अशा पद्धतीने चढाओढीने सभा घेणे मूर्खपणा आहे. कामे केली तर सभेची गरज नाही ” असा प्रहार कडू यांनी यावेळी केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल काही येऊदे, सरकार हेच राहील, एकनाथ शिंदे आणि पंधरा आमदार अपात्र होणार नाहीत, त्यांनी कोर्टात ठोस कागदपत्र सादर केली आहेत,त्यामुळे हेच सरकार राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आघाडी सरकार असताना बच्चू कडू मंत्री होते मात्र शिंदे सरकार मध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही यावर त्यांनी भाष्य करताना म्हटले की माझे मंत्रिपद गेले, या सरकार मध्ये अजून मिळाले नाही,तरी मी खुश आहे कारण दिव्यांग मंत्रिमंडळाची स्थापना झाली.आता मंत्रिमंडळाचा विस्तार २०२४ नंतर होईल असे सांगत त्यावेळी वर्णी लागू शकते असे अप्रत्यक्ष मत प्रगट केले.