नवी मुंबई: एकही आमदार अपात्र ठरणार नसून, सरकार पडणार नाही असा ठाम विश्वावर आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे पक्षाच्या आढावा बैठकी निमित्त ते आले असता त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षावरही टिकास्त्र सोडले.

नवी मुंबई प्रहार संघटनेची आढावा बैठक आज नेरुळ येथे पार पडली. याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आगामी काळातील कामांबाबत मार्गदर्शन केले.  

Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती

आणखी वाचा-VIDEO: “केरळची सत्य परिस्थिती केरळची आहे, विदेशातून…”, आकडेवारी देत जितेंद्र आव्हाडांचं ‘द केरला स्टोरी’वर भाष्य, म्हणाले..

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षावरही टिका केली. “सध्या सभा सर्वत्र होत असून एकाने सभा घेतली की दुसरा घेतो. यातून लोकांना काय मिळते? अशा पद्धतीने चढाओढीने सभा घेणे मूर्खपणा आहे. कामे केली तर सभेची गरज नाही ” असा प्रहार कडू यांनी यावेळी केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल काही येऊदे, सरकार हेच राहील, एकनाथ शिंदे आणि पंधरा आमदार अपात्र होणार नाहीत, त्यांनी कोर्टात ठोस कागदपत्र सादर केली आहेत,त्यामुळे हेच सरकार राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आघाडी सरकार असताना बच्चू कडू मंत्री होते मात्र शिंदे सरकार मध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही यावर त्यांनी भाष्य करताना म्हटले की माझे मंत्रिपद गेले, या सरकार मध्ये अजून मिळाले नाही,तरी मी खुश आहे कारण दिव्यांग मंत्रिमंडळाची स्थापना झाली.आता मंत्रिमंडळाचा विस्तार २०२४ नंतर होईल असे सांगत त्यावेळी वर्णी लागू शकते असे अप्रत्यक्ष मत प्रगट केले.

Story img Loader