नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा मुंबईत धडकणार असून २५ तारखेला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चेकऱ्याचा  मुक्काम नवी मुंबईत होणार आहे. त्या अनुषंगाने हजारो वाहने येणार असून नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने कंबर कसली आहे, 

मराठा आरक्षण मागणीसाठी  मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून  जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा सुरु केली आहे. त्यांच्या पदयात्रेबरोबर मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा आहे. ही पदयात्रा २५ तारखेला  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणार असून पदयात्रेचा एका दिवसाचा मुक्काम देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहे.

Shyam Manav, Shyam Manav Nagpur, constitution,
संविधानाचा मुद्दा, श्याम मानव अन् भाजपची राडा संस्कृती
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
Ropeway project, Tadoba tiger reserve
ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी आता ‘रोपवे टूरिझम’…
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री
Pune Metro
Pune Metro : पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक, दिला ‘हा’ इशारा; पुण्यात राजकारण तापलं
Narendra Modi pune, Ganesh Kala Krida Rangmanch,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याची शक्यता, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तयारी सुरू
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!

हेही वाचा >>> नवी मुंबई : महापालिका शिक्षकांवर सर्वेक्षण कामांचा भार!

पदयात्रेसोबत मार्गस्थ असलेली वाहने तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन योग्य प्रकारे नियोजनासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत.   २५  जानेवारी रात्री  ००:०१ ते २६ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या अवजड, मालवाहतुक करणा-या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी  करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यातून  जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पदयात्रे सोबत असलेली वाहने, प्रवासी वाहतूक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही, असे परिपत्रक वाहतूक विभागाने काढले आहे.