नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक इमारत चार महिन्यापासून तयार आहे. मात्र त्याचे लोकार्पण अद्याप केले गेले नाही. या बाबत अनेकदा पाठपुरावा केला तरीही रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत जर लोकार्पण तारीख जाहीर केली नाही तर रेल रोको आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते ऐरोली दरम्यान दिघा येथे रेल्वे स्थानक इमारत बांधण्यात आली आहे. अनेक महिने उलटून त्याचे लोकार्पण करण्यात न आल्याने या परिसरातील सामान्य नागरिक, आय टी आणि एमआयडीसी मधील कामगार अधिकारी व अन्य घटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
Protest of students, traffic jam, chinchoti road,
वसई : वाहतूक कोंडीपासून त्रस्त विद्यार्थी व भूमिपुत्रांचे आंदोलन, महामार्ग व चिंचोटी रस्त्याच्या समस्येबाबत संताप
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
Only 46 percent of the Kalwa Airoli Elevated Project has been completed in seven and a half years
साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्केच काम; भूसंपादन, पुनर्वसन प्रक्रियेतील संथगतीचा फटका
cyber crime
New Cyber Fraud: मोबाइलच्या किपॅडवर ‘शून्य’ दाबताच लाखोंचा गंडा; या सायबर स्कॅमपासून सावध व्हा
Vande Bharat pune, special train pune, pune train,
पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार

हेही वाचा >>>धक्कादायक! अडीच लाखात विकले १७ दिवसांचे बाळ..;आरोपीमध्ये आईचाही समावेश,वाचा प्रकार काय… 

ठाणे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ऐरोली कळवा एलिव्हटेड प्रकल्पाचा एक भाग दिघा रेल्वे स्थानक आहे. चार महिन्यापासून लोकार्पण करण्यास चालढकल होत आहे. याबाबत निवेदन आणि दोन स्मरणपत्र देण्यात आली. मात्र काही हालचाल नसल्याने रेल्वे प्रशासनास गांभीर्य नाही असा आरोप खासदार विचारे यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत जर लोकार्पण तारीख जाहीर केली नाही तर रेल रोको आंदोलन करण्याचा त्यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.