उरण: नवरात्रोत्सवात घरोघरी घट स्थापना केली जाते त्यासाठी नारळाच्या शाहळ्यांचे मुखवटे बनवून त्याची पूजा करण्याची परंपरा ही आहे. त्यासाठी उरणच्या नागाव मध्ये गजानन नाईक हे वयाच्या ८० व्या वर्षी आपल्या कलेच्या साधनेतून हे मुखवटे मागील ६० वर्षांपासून तयार करीत आहेत. त्याचा कोणताही मोबदला ते मागत नाहीत. देवीचे भक्त जे देतील ते स्वीकारून ही सेवा ते अविरत करीत आहेत. या मुखवट्याना रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून मागणी आहे.

दरवर्षी ३५ पेक्षा अधिक मुखवटे बनविले जातात. यासाठी झाडावरील अर्धे कच्चे नारळ कडून ते व्यवस्थित सोलून त्याला मखवट्याचा आकार दिला जातो. त्यानंतर आक्रयलिक रंगाने रंगवून मुखवटा तयार केला जातो. त्यानंतर त्याची मखरात सजावट करून दागदागिने घालून देवीची नऊ दिवसांसाठी प्रतिष्ठापना केली जाते. मुखवट्याचे काम हे व्यवसाय म्हणून नव्हे तर कलेची जपवणूक करण्यासाठी करीत असल्याची माहिती कलाकार गजानन नाईक यांनी दिली.

Rain with strong gale in Karjat taluka lightning struck house in Kopardi
कर्जत तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, कोपर्डी येथे घरावर वीज कोसळली
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
BJP MLA Devrao Holi problems increased during the assembly elections
गडचिरोली: ‘या’ भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण जाणून घ्या…
Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा
What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

हेही वाचा… एपीएमसी समोरील रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान कायम

विद्यार्थी दशेतच घरातील देवीसाठी मुखवटा बनवून याची साठ वर्षांपूर्वी सुरवात केली. तसेच यासाठी दहा दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते. त्याचप्रमाणे सध्या अनेकजण चांदीच्या मुखवट्याना रंग देण्याचं काम केलं जातं. यावर कोविड काळाचा परिणाम झाला आहे. या वारशाची जपवणूक होण्याची गरज आहे.