उरण : पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात येत असून रविवार (१ ऑक्टोबर) पासून जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही भाऊचा धक्का ऐवजी गेट ऑफ इंडिया या मार्गावर जाणार आहे, अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे. पावसाळ्यातील चार महीने भाऊचा धक्का (फेरी वार्फ जेट्टी) पर्यंत जाते. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.

हेही वाचा : उरणमध्ये धुके की प्रदूषणाचे धुरके ?

ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Namo e Waste Management IPO from today
नमो ई-वेस्ट मॅनेजमेंटचा ‘आयपीओ’ आजपासून
Cabinet approves a 309 Km long new line project
Rail Connectivity : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! एक हजार गावे अन् ३० लाख लोकांना होणार फायदा, मुंबई-इंदूरदरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित
Overhead Wire Break at mankhurd
Overhead Wire : मानखुर्द ते वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, लोकल सेवा विस्कळीत, ट्रान्सहार्बरने प्रवास करण्याची मुभा
vistara to merge into air india on november 12
‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबरला विलीनीकरण
AC local trains, central railway, railway passengers
मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर
Mumbai, Western Railway, AC Local Trains, Technical Failure, Passenger Inconvenience, Train Breakdown, Churchgate Station, Point Failure, Train Delays,
पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड

उरण मधील मोरा व जेएनपीटी या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवा बारमाही म्हणजे पावसाळ्यातही सुरू असतात. यातील मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) या सेवेचे पावसाळी तिकीट दर वाढविण्यात येतात. तर जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ही सेवा आठ महीने सुरू असते. ती पावसाळ्यात बदलून जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जेएनपीटी लाँच सेवा ही रात्री दहा ऐवजी ९ वाजता बंद केली जाते. ती पुन्हा रात्री दहा वाजता पर्यंत सुरू राहील. या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीकही प्रवास करीत आहेत.