नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थनाकाबाहेरील परिसरात दिवसेंदिवस बकालपणा वाढत चालला आहे. बेघरांचे बस्तान रेल्वे स्थानकालगत असलेल्या जागेवर वसले आहे. फूटपाथवर राहणारे बेघर नागरिक त्याच ठिकाणी आपला संसार थाटून बसलेले आहेत. यांच्याकडून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरविण्यात येत आहे. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिका शहरात विशेषतः रेल्वे लगतच्या भिंतींना रंगरांगोटी करतेय, मात्र सिडको आणि महापालिकेचे परिसरात होत असलेल्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या सिडकोच्या भूखंडावर तसेच पदपथावर अनधिकृत झोपड्यांचा विळखा वाढला होता. या अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर मोठ्या पोलीस फौजफाट्यासहित तोडक कारवाई करण्यात आली. मात्र आता त्या कारवाई केलेल्या बेघरांनी रेल्वे स्थानकाबाहेर आपला तळ ठोकला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून याठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरत आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळी जागा आणि सेवा रस्ता याठिकाणी सिडकोने बाबूं बांधून ‘पे अँड पार्क’ सुरू केले आहे.

Those who cannot go to Prayagraj will get experience of holy Kumbh Mela in Nagpur
प्रयागराजला जाणे शक्य नाही; ‘येथे’ मिळणार पवित्र कुंभस्नानाची अनुभूती…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Karjat Railway Station
Karjat कर्जत रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच

हेही वाचा : नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत

रेल्वे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी जी जागा उपलब्ध होती त्यावरच या बेघरांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास तर सहन करावा लागतच आहे. शिवाय हे झोपडपट्टी धारक त्याच ठिकाणी संसार थाटून बसल्याने त्याच ठिकाणी अंघोळ,कपडे भांडी ही धुतली जात आहेत. त्यामुळे हा रेल्वे स्थानक परिसर आहे की झोपडपट्टी अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याकडे आद्यप सिडको तसेच महापालिकेने कोणतीही कारवाईची तत्परता दाखविली नाही. हा परिसर स्वच्छ कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Story img Loader