उरण : जगातील अत्याधुनिक बंदर म्हणून बिरूद मिरवणाऱ्या जेएनपीटीला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ते पाण्यानी भरले असून या रस्त्यावर झालेल्या खड्डे आणि त्यातील चिखलामुळे नागरिकांनी त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गाने उरणमधील एसटी व एन. एम. एम. टी. व इतर प्रवासी वाहनेही प्रवास करीत आहेत. त्याचप्रमाणे बंदरातील मालाची ने आण करणारी शेकडो मालवाहतूक वाहनेही ये-जा करीत आहेत. एकीकडे जेएनपीटीला जोडणाऱ्या जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबईतील आम्रमार्ग असे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यांच्या उभारणीसाठी अडीच हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र ३४ वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या उरण पनवेल मार्ग ते करळ मार्गे जेएनपीटी या मार्गाची दुरावस्था झाली आहे.

हेही वाचा : समुद्राच्या उधाणाने नादुरुस्त बंदिस्तीच्या कामाला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये होणार कायमस्वरूपी मजबुतीचे काम

Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
thane traffic police did not get Solid solution
ठाणे : वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा
Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार
nagpur, Dharampeth, pub license, drug abuse, noise disturbance, Nagpur pub, residential area, Shankarnagar, Ramnagar, political influence, police action, Nagpur news,
नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

हेही वाचा : सहा महिन्यात दुप्पट पैसे… आमिषाला बळी पडून सव्वादोन लाखांची फसवणूक

साधारणतः ३६ वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराचे काम मित्सुबी या जपानी कंपनीने केले. त्यावेळी या मुख्य रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला जेएनपीटी हे एकमेव बंदर कार्यान्वित होते आणि जेएनपीटी बंदराला जोडणारा एकमेव मार्ग होता. मात्र तरीही या मार्गावर खड्डे पडले नव्हते. सध्या या मार्गावर उरण पनवेल मार्ग ते करळ गाव दरम्यानच्या रस्त्याला दोन्ही बाजूने प्रचंड खड्डे आहेत. या खड्डयात चिखल आणि पाणी साचू लागले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या खड्डे आणि चिखलातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जेएनपीटी बंदराला जोडणारा हा पहिला मार्ग असून अनेक वर्षे या मार्गावरून जड वाहने ये जा करीत आहेत. मात्र मजबूत बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर खड्डे नव्हते. या रस्त्यावर फेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यानंतर खड्डे पडू लागल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे मत निलेश तांडेल यांनी व्यक्त केले आहे.