उरण : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. यानिमित्ताने उरणच्या करंजा, मोरा तसेच ग्रामीण भागातील बंदरात तयारी सुरू झाली आहे. शासनाकडून १ जून ते ३१ जुलै दरम्यानची खोल समुद्रातील मासेमारीवरील दोन महिन्यांची बंदी कालावधी गुरुवारी १ ऑगस्टला संपणार आहे. त्यासाठी मच्छीमार नाखवा (बोटीचा मालक) दर्याला निघाला असून बंदरावर लगबग सुरू झाली आहे.

उरणमधील करंजा व मोरा बंदरांसह इतर बंदरांतील मच्छीमार एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. दोन महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्याने खवय्यांची ताज्या मासळीची समस्या दूर होणार आहे. यासाठी दोन महिन्यांपासून उभ्या करण्यात आलेल्या बोटींची रंगरंगोटी, त्यावरील उपकरणे, इंजिनची डागडुजी, छिद्र पडलेल्या जाळीची दुरुस्ती तसेच बोटी समुद्रात नेऊन त्यांची तपासणी आदी कामे सुरू आहेत.

Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
one and a half months Recce is done for killing Vanraj Andekar
खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
variety of vegetables on platter owing to price cuts in pune
या आठवड्यात भाज्यांच्या मेन्यूत विपुल वैविध्य; भेंडी, गवार, कोबी, वांगी, शेवगा एवढे पर्याय उपलब्ध!
ST bus service, ST bus, ST bus maharashtra,
तोट्यातील ‘एसटी’ नफ्याच्या उंबरठ्यावर, झाले असे की…
Inequality bias maternity leave setbacks stop women's career growth Women face harassment in the workplace
महिलांच्या वाटेवर अडथळ्यांची रांग! लैंगिक छळ अन् भेदभावामुळे नोकरदार महिला हतबल; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

हेही वाचा : ‘नैना’तील रस्त्यांसाठी पुन्हा निविदा, तीन हजार ४७६ कोटींच्या निविदा जाहीर, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने रस्ते बांधणीची कामे

मत्स्यव्यवसाय विभागाकडून पावसाळ्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीकरिता खोल समुद्रात मासेमारीस बंदी घालण्यात येते. त्यामुळे या बंदी काळाचा पुनर्विचार करण्याची ही मागणी पुढे येत आहे. या कालावधीत करंजा बंदरात मासेमारी करणाऱ्या अनेक बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली होती.

हेही वाचा : नवी मुंबई: महायुतीत झोपडपट्टी पुनर्वसनावरून वाद, झोपु योजना गणेश नाईकांमुळेच रखडल्याचा आरोप

थकीत अनुदान

मासेमारीवर बंदी असल्याने दररोज मिळणाऱ्या ताज्या व मोठ्या मासळीची आवक कमी होते. त्यामुळे खवय्यांना शीतगृहात साठवून ठेवण्यात आलेल्या मासळीवर विसंबून राहावे लागते. दुसरीकडे सरकारने मच्छीमारांच्या डिझेलवरील लाखो रुपयांचे परतावे (अनुदान) थकीत असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमारांनी दिली आहे. तर हा हंगाम तरी कोणतेही वादळी विघ्ने न येता सुरू व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.