येत्या २ वर्षात पायाभूत सुविधा तसेच पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत उदयोजकांना दिले. बुधवारी ते लघु उद्योजक संघटना, एमआयडीसीकडून महापे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी एमआयडीसीचे उच्च पदस्थ अधिकारी तसेच लघु उद्योजक पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मनपा आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा- पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी दिलीप वेंगसरकर आणि गायक सागर म्हात्रे

agricultural extension officer caught while accepting bribe in dhule district
धुळे जिल्ह्यात लाच स्वीकारताना कृषिविस्तार अधिकारी जाळ्यात
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Success story of megha jain who got business idea while planning for the wedding now owns multi crores business owner of kenny delights
लग्नाची तयारी करताना सुचली कल्पना अन् घेतला धाडसी निर्णय; आता करतात कोटींची कमाई, नेमका कोणता व्यवसाय करते ‘ही’ व्यक्ती
supreme court justice bhushan gavai in anandwan
अनेक संस्थांची संस्थानिके, मात्र आनंदवनात सेवाभाव!न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; आनंदवन मित्रमेळाव्याचे उद्घाटन
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
technical inventions used by indians brilliantly in the freedom struggle
स्वातंत्र्याच्या पाऊलवाटेवरचे तंत्रज्ञान!
entrepreneur ujjwala phadtare story in marathi
नवउद्यमींची नवलाई : कृत्रिम प्रज्ञेच्या पुरवठादार
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नवी मुंबईतील उद्योजकांसमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लघु उद्योजकांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना या समस्या सोडविण्यासाठीचे निर्देश देण्यात आले. आठवड्यातील दोन दिवस राज्यातील मोठ्या औद्योगिक वसाहतींना भेट देऊन समस्या जाणून घेणार व त्यावर उपाययोजना करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा- यंदा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाची दिवाळी गोड …..किती मिळणार सानुग्रह अनुदान !

एमआयडीसीमधील सर्व रस्ते दोन वर्षांमध्ये पूर्ण होतील. पाण्याच्या योजना एका वर्षामध्ये पूर्ण होतील. मलनिःसारण वहिनीसारखे विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले. तसेच आयटी पॉलिसी फायनल केली आहे. आयटीमधील इंडस्ट्रियल सेक्टरला जास्तीत जास्त लाभ देण्याची भूमिका सरकारची आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर एक चांगली आयटी पॉलिसी पुढे येईल आणि त्यातून आयटी उद्योग उभारी घेईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Story img Loader