उरण : शुक्रवारी अकरा साडेअकरा वाजताच्या सुमारास उरणच्या पिरवाडी परिसरातील समुद्रात दोन पर्यटक अडकल्याचे वृत्त आले. याची माहिती मिळताच नागाव – पिरवाडीमधील सागरी रक्षा दलाच्या तरुणांनी मिळेल त्या साधनाने त्यांना वाचविण्याची तयारी केली. यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दोन जीवरक्षकांनी खडकात जात शहानिशा केली तर माणसं नव्हती तर ती कुत्री असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र येथील स्वयंसेवी सागरी जीव रक्षकांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुरक्षा साधने आणि उपकरणे उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे पुन्हा एकदा उरणच्या सागरी सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

शुक्रवारी दुपारी अकरा साडेअकरा वाजता उरणच्या पिरवाडी समुद्रातील खडकात भरतीचे पाणी वाढल्याने खडकात कोणीतरी अडकलेले दिसत होते. यात दोन माणसं असावीत असा संशय आणि अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार स्थानिक सागरी रक्षकांनी उरण पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे पोलीस सज्ज झाले. अग्निशमन दलालही प्रचारण करण्यात आले. त्याचवेळी स्थानिकांच्या मदतीने सागरी सुरक्षारक्षकांनी त्याच्याच बोटीने खडकाजवळ जात शहानिशा केली. त्यावेळी खडकात माणसं नसून दोन कुत्री अडकली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निश्वास सोडला.

A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Crime Scene
Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”

हेही वाचा – कळंबोली मार्बल मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा फरशी पडून मृत्यू, कामगारांचे काम बंद आंदोलन

सागरी सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उरणला पिरवाडी व केगाव – दांडा हे दोन समुद्र किनारे आहेत. या दोन्हीपैकी पिरवाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्यने पर्यटक येत असतात. येथील पिरवाडी दर्ग्याच्या पुढे ओहोटीच्या वेळी समुद्रातील खडकापर्यंत पर्यटक जात असतात. तसेच किनाऱ्यावर अनेक पर्यटक समुद्रात पोहतात. समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्याचा वेग पाहता पर्यटक वाहून जाण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यांना वाचविण्यासाठी सागरी सुरक्षा दल आहे. त्यासाठी येथील स्थानिक तरुण स्वयंसेवी भावनेतून जिवावर उदार होऊन पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याजवळ आवश्यक ती सुरक्षा उपकरणेच नसल्याची त्यांची तक्रार आहे.