उरण: जेएनपीए प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर २४ तासांनी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी अखेर जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलन मागे घेतले आहे. या कालावधीत २४ तास बंदरातील जहाज मालवाहतूक ठप्प झाल्याने बंदराचे कोटींवधींचे नुकसान झाले आहे. या आंदोलनाचा जागतिक व्यापारावरही परिणाम झाला आहे. वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे आधी पुनर्वसन करा त्यानंतरच बंदरांचा विस्तार करा अशी भूमिका घेत शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजल्या पासून संतप्त ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरले होते. जेएनपीए बंदराच्या समुद्री चॅनल परिसरात छोट्या मच्छीमार बोटी आडव्या टाकून हे आंदोलन सुरू केले होते. याचा परिणाम

जागतिक स्तरावर झाल्याने याची दखल केंद्रीय बंदर मंत्री सारबनंद सोनेवाल व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. आंदोलनाच्या दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे एन डी आर एफ व रेस्क्यू पथक ही तैनात ठेवण्यात आले होते. जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावाची जमीन संपादन करून त्याचे उरण येथील बोरी येथे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार १७ ऐवजी केवळ २ हेक्टर क्षेत्रातच २५६ कुटुंबाचे १९८५ साली पुनर्वसन करण्यात आले आहे.

४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ganga River Varanasi
Varanasi News : गंगा नदीवर दोन बोटींची टक्कर झाल्याने एक बोट बुडाली, एनडीआरएफच्या तत्परतेमुळे १८ प्रवासी सुखरुप!
95 percent of the country foreign trade is carried out through the coast print eco news
किनारपट्टीद्वारे देशाचा ९५ टक्के परराष्ट्र व्यापार
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Major action against sand smugglers Revenue Department destroys 15 boats
बुलढाणा : वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई, महसूल विभागाने १५ बोटी केल्या उद्ध्वस्त
minister madhuri misal instructed pune municipal corporation
दंडमाफीचा प्रस्ताव द्या, नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेला काय केल्या सूचना ?

हेही वाचा… कोळीवाडा ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे जेएनपीए बंदराच्या जहाज वाहतुकीवर परिणाम; पंधरा तासात १२ जहाजे रखडली

१९९२ ला हनुमान कोळीवाडा गावातील २५६ घरासह संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे.त्यामुळे १७ हेक्टर क्षेत्रावरच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मागील ३८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.या ३८ वर्षात ५०० हून अधिक बैठका झाल्या मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थांनी खास करून महिलांनी आक्रमक होत जेएनपीए विरोधात संघर्षच सुरु केला आहे. जेएनपीएने गावाच्या पुनर्वसनासाठी विकासित १०.५० हेक्टर जमीन देण्याचे मान्य केले आहे.त्याच्या मंजूरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

Story img Loader