पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हे दाखल

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील हवेचा दर्जा बिघडविणाऱ्या तळोजातील ‘धूर’खान्यांवर  कारवाई करण्यात आली आहे. नायट्रोजन डायऑक्साईड छुप्यारीतीने सोडणाऱ्या तळोजा आौद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांविरोधात ‘लोकसत्ता’ने कायम आवाज उठविला आहे.  १५ कारखान्यांच्या प्रतिनिधींवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

five thousand rupees fine Throwing food on the street nagpur city corporation
धडक कारवाई! अन्न रस्त्यावर फेकणे पडले महागात; ५ हजारांचा दंड…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
issue of Illegal garbage dump at Gaimukh area
गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी ? राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी

अनेक वेळा ताकीद देऊनही प्रदूषणाची मात्रा कमी होत नसल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सीईटीपी) गुरुवारी भेट दिली. त्यांनी रात्री उशिरा तळोजा पोलीस ठाण्यात सीईटीपी केंद्रचालक व संचालक मंडळावर पर्यावरणाची हानी केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तळोजा सीईटीपीचालक व कार्यकारिणीचे सदस्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. उत्पादन निर्मितीनंतर निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून थेट नदीत सोडण्याची प्रक्रिया होणे सीईटीपी केंद्रात अपेक्षित आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चार वाजता एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना न कळू देता मंत्री कदम यांनी भेट दिल्यावर दोन प्रकल्पांपैकी १२ एमएलडी क्षमतेचा एक प्रकल्प बंद अवस्थेत दिसला. तसेच सीईटीपी केंद्रातून खाडीपात्रामध्ये पंपाने केंद्रचालक पाणी सोडत असल्यामुळे खाडीपात्र प्रदूषित होत असल्याचे दिसल्यामुळे ही फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. सीईटीपीच्या संचालकांचे स्वत:चे कारखाने आहेत, तर काही सदस्य कारखान्यांचे व्यवस्थापन सांभाळतात.

Story img Loader