मुंबईची तहान भागविणाऱ्या बारवी धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या अशा धरणग्रस्तांना नुकतेच नवी मुंबई ठाणे मिरा भाईंदर आदी मनपा मध्ये कायम नौकरीत समाविष्ट करण्यात आले. याच धर्तीवर आपल्या १०० % जमिनी नवी मुंबई बसवताना देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनाही कायम नौकरी देण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. या बाबत मनपा आयुक्तांची भेट घेत कायम नौकरीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी केली असून याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >>>नवी मुंबई: ब्लॅक स्पॉट ठिकाणी सायकल ट्रॅक हवाच का?

Skill-based education is the door to development says Haribhau Bagde
कौशल्याधारित शिक्षणातूनच विकासाचे दार – हरिभाऊ बागडे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Decision on complaint application against Rahul Solapurkar will be taken only after legal verification says Amitesh Kumar
सोलापूरकर यांच्याविरोधातील तक्रार अर्जाबाबत कायदेशीर पडताळणी करूनच निर्णय
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Navi Mumbai , Science Center ,
नवी मुंबई : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विज्ञान केंद्राचे ९० टक्के काम पूर्णत्वास
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय

नवी मुंबई प्रकल्पग्रस्त कर्मचारी करारपद्धतीवर ६ महिन्यांच्या नियुक्ती आदेशान्वये किमान वेतनावर गेल्या १५ वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुटपुंज्या पगारामध्ये अविरत सेवा बजावित आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी नोकरी करण्याचे वय देखील निघून गेलेले आहे. सर्व कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत.नवी मुंबई मनपा मध्ये गेल्या काही वर्षात अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले पर्यायाने अनेकांना पदोन्नती मिळाली. याच कारणाने लिपिक संवर्गातील बहुतांश पदे रिकामी आहेत. नवी मुंबई शहर वसविताना येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या १००% जमिनी दिल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची गरज असताना बारवी धरणग्रस्तांच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या विशेष आदेशाने नवी मुंबई महानगरपालिकेध्ये कायमस्वरुपी थेट नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये विविध संवर्गात कार्यरत असणाऱ्या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना देखील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कायमस्वरुपी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत स्वच्छताकर्मीही होत आहेत आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित

याकरिता अधिसंख्या पद निर्माण करण्यास मान्यता देण्याची आवश्यकता असून आस्थापना खर्चातून सूट देणे किंवा नवीन आकृतीबंधात हि पदे मंजूर करून देणे आवश्यक आहे. विहित मार्गाने निवड प्रक्रिया झालेली नसली तरीही गेली ७ते १५ वर्षे कर्मचारी महापालिकेत काम करत आहेत. त्यामुळे बारवी धरणग्रस्त धर्तीवर विशेष बाब म्हणून कायम करण्यात यावे तसेच शैक्षणिक अहर्ता शिथिल करणे गरजेचे आहे. सदरबाबत आपण प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्यास सदर सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचारी कायमस्वरूपी होण्यास मदत होईल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील करारपद्धतीवरील विविध संवर्गातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेमध्ये सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे त्वरित पाठविण्यात यावा. अशी मागणी केल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.या बाबत हिवाळी आदिवेशात आवाज उठवणार असल्याचेही आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

Story img Loader