लोकसत्ता टीम

उरण : मंगळवारी सुटलेल्या सोसाट्याचा वारा अतिवृष्टी व खराब हवामान यामुळे भारतीय हवामान विभागाने समुद्रात धोक्याचा इशारा दिल्याने उरण मधील मोरा मुंबई जलसेवा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना रस्ते मार्गाने लांबचा प्रवास करावा लागत आहे. ही सेवा शुक्रवारी सुरू होण्याची शक्यता बंदर विभागाने व्यक्त केली आहे.

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
panvel mangalsutra theft marathi news
पनवेल: पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरले
navi Mumbai project victims
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प बाधितांचे आंदोलन रस्त्यावर रोखले
uran water accumulated marathi news
पहिल्याच जोरदार पावसाने पुन्हा एकदा उरण रेल्वे स्थानक पाण्यात बुडाले; प्रवाशांचे हाल सुरू, रेल्वेने पंप लावून ही पाणी साचले
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
Burglary of Rs 52 lakh in Kharghar
खारघरमध्ये ५२ लाख रुपयांची घरफोडी
Leopard in Rashtrapati Bhavan
Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…

आणखी वाचा-पनवेलमधील सुरक्षा रक्षकांना, वार्डनला पावसाळी रेनकोट कधी मिळणार

उरणच्या मोरा,जेएनपीटी व करंजा या तीन बंदरातून मोरा ते मुंबई, जेएनपीटी ते मुंबई व करंजा ते रेवस(अलिबाग)या जलमार्गाने मार्गावर पावसाळ्यात ही सेवा सुरू असते. सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी व खराब हवामानामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणे धोक्याची असल्याने ही जलसेवा बंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) ही जलसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.