धरण भरण्यासाठी सरासरी ४५०० मिमी पावसाची गरज

नवी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने या वर्षी नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. धरण भरण्यासाठी धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ४५०० मिमी पावसाची गरज भासणार आहे. सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

E-KYC of two lakh ration beneficiaries pending in Vasai
वसईत दोन लाख शिधालाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित; १५ फेब्रुवारी पर्यंतची मुदत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
Mobile phone tariff declined 94 pc since 2014 says Jyotiraditya
मोबाईल फोन सेवांचे दर देशात सर्वाधिक कमी; इतकी स्वस्त झाली सेवा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Budget 2025 Provisions for the Defence Sector GDP Modernisation of the Defence Sector
संरक्षण क्षेत्रात ‘हवेत गोळीबार’
Will Trump start a war over the Panama Canal Why is this issue so important to America
पनामा कालव्यासाठी ट्रम्प युद्ध छेडणार? अमेरिकेसाठी हा मुद्दा इतका महत्त्वाचा का?
Renovation of Ram Ganesh Gadkari Rangayatan Theatre is underway reduced seating capacity by 50 60 chairs
ठाण्याच्या गडकरी रंगायतनची आसन क्षमता होणार कमी, जुन्या खुर्च्यांच्या जागी लागणार नवीन एैसपैस खुर्च्या

गेल्या वर्षी पाऊस झाल्याने धरण पातळीत वाढ होत आजच्या दिवशी ७५ मीटर पाणी पातळी होती. ती आता ५ मीटर कमी असून आता ७० मीटर पाणीपातळी आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास नवी मुंबई शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होता. हे धरण काही वर्षांचा अपवाद वगळता कायम पूर्ण क्षमतेने पूर्ण भरून वाहते. त्यामुळे शहराला कधीही पाणीटंचाई भासत नाही. २४ तास पाणीपुरवठा करणारे शहर म्हणून नवी मुंबईचा राज्यात नावलौेकिक आहे.

या वर्षी नवी मुंबईत १० जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मात्र शहरात व धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. आतापर्यंत फक्त १८८ मिमी पावसाची नोंद धरण पाणलोट क्षेत्रात झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत ८९९.२० मिमी तर सरासरी ३८०० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. यावर्षी आतापर्यंत तुरळक पाऊस झाल्याने पुढील काळात धरण भरण्यासाठी सरासरी ४५०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. आतापर्यंत धरण ५० टक्केपर्यंतही भरलेले नसल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चिंता व्यक्त होत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास शहरावर पाणीकपात करण्याची वेळ येणार आहे. २०१८ या वर्षी धरण २५ जुलै रोजी तर २०१९ या वर्षी ४ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते.

शहराला पाणी पुरवठय़ासाठी या धरणातून प्रतिदिन ४२० दशलक्ष लिटर पाणी दररोज घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. सद्यास्थीतीत २७.८२ टक्के पाणीसाठा असून ७०.०२ मीटर पाण्याची पातळी असून ५३.११० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाठा व पाऊस

वर्ष २०२२-२३               वर्ष २०२१-२२

सरासरी                       १८८ मिमी                   ८९९.२० मिमी

धरणाची पातळी          ७०.०२ मीटर                ७४.९० मीटर

एकूण संचयन            ५३.११० दलघमी          ८१.४६९ दलघमी

पाणीसाठा                    २७.८२ टक्के                 ४२.६७ टक्के

Story img Loader