नवी मुंबई : “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात “नवी मुंबई इको क्नाईट्स” संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत ४१ हजारहून अधिक विद्यार्थी, युवकांनी या कचरा विरोध लढाईत सहभागी होत स्वच्छतेचा जागर केला. मात्र पाम बीच मार्गालगत आयोजित करण्यात आलेली मानवी साखळी नियोजन मात्र फसले होते.केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये “युथ वर्सेस गार्बेज” या टॅगलाईन नुसार कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यामध्ये ५३ हजारहून अधिक युवकांनी स्वच्छ नवी मुंबईचा जागर केला. राजीव गांधी मैदानात ४१ हजार तर वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र येथील सभागृहात लावलेल्या बीग एलईडी स्क्रीनवरुन १२ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा