अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रकल्प अहवाल प्राप्त , निविदा प्रक्रियेला विलंब कशासाठी
नवी मुंबई– संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्रभर व्यापक स्वरुपात स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेने सलग पहिले ३ वर्ष महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला. यंदा देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महापालिकेला मिळाला असून नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरु केली असून आधुनिक पध्दतीचा व ई वाहतूकीला प्राधान्य देण्याच्या विचारात महापालिका आहे. एकीकडे शहरासाठी कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रकल्प अहवालही पालिकेला प्रप्त झाला आहे. परंतू त्या प्रकल्प अहवालाच्या मंजुरीनंतर पालिकेला या कामाबाबत निविदा काढता येणार आहे. त्यामुळे या कामाच्या ठेक्यासाठी राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेला विलंब कशासाठी प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकाही कचरा वाहतूक संकलनासाठी कधी निविदा राबवणार व सततची मुदतवाढीची घंटा थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा