उरण : पहिल्या जोरदार पावसात येणाऱ्या चिवणी या काटेरी माशांचे प्रमाण घटल्याने त्यांचे दर कडाडले आहेत. एकूण सहा नगांचा दर ५०० रुपये म्हणजे एका नगाचे दर जवळपास शंभर रुपयांवर पोहोचले आहे. पावसाच्या सुरुवातीला येणाऱ्या मासळीला उधवन म्हटले जाते. (उधवन म्हणजे समुद्रपार करून खाडीत प्रवेश करणारे मासे) या पहिल्या माशांचा आस्वाद घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

पाऊस लांबल्याने या माशांचे आगमनही उशिरा झाले आहे. त्यातच विकासाच्या नावाने उरणमधील अनेक खाड्यांची मुखे बुजविण्यात आली आहेत. किंवा ती वळविल्याने माशांच्या प्रमाणात घट झाली आहे. तर दुसरीकडे इतर मार्ग बंद असल्याने मोकळ्या असलेल्या बेलपाडा खाडीत बुधवारी एकाच वेळी हजारोंच्या संख्येने चिवणी मासा आला होता.

Inflation in food prices hit a nine month high of 5 5 percent
खाद्यान्नांच्या किमतीतील भडक्याने कहर; किरकोळ महागाई साडेपाच टक्क्यांच्या नऊमाही उच्चांकाला
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
demand for bananas in navratri has decreased
नवरात्रातील उपवासकाळ असूनही केळ्यांना मागणी कमी
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
Benefits of PPF Investment in 2024
‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!
ex corporator demand compensation for jogeshwari residents for suffer heavy loss due to rain
अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

हेही वाचा – Buldhana Bus Accident : आजारी आई, बेरोजगार भावांचा आधार गेला!, नोकरीनिमित्ताने पुण्याला निघालेली जोया परतलीच नाही

चिवणी हा काटेरी मासा असून पावसाळ्यात अंड्यासह मिळणारा हा मासा म्हणजे किनारपट्टीवरील खवय्यासाठी मेजवानीच असते. त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने मिळत असल्याने त्याचा सर्वचजण आस्वाद घेतात. मात्र यावर्षी उशिराने आलेल्या या माशांच्या दराने उचांक गाठला असल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसत आहे.