पनवेल : बहुप्रतिक्षीत असलेल्या नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा नवरात्रोत्सवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जात आहे. यासाठी गुरुवारी खारघर येथे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक खारघर येथे पार पडली. परंतु हा सोहळा किती तारखेला निश्चित केला जातोय, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली नाही. प्रधानमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही निश्चित तारीख न कळाल्याने नवी मुंबई पोलीस, सिडको मंडळ आणि रायगड जिल्हा प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत १४ ऑक्टोबर (सर्वपित्री अमावस्या) किंवा १५ ऑक्टोबर (नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी) हा सोहळा होईल, असा अंदाज बांधून या बैठकीत नियोजन केले जात आहे. नवी मुंबई मेट्रोतून गारेगार प्रवास सुरु करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न खारघर, तळोजावासियांचे यानिमित्ताने पुर्ण होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा