लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : मुंबई महापालिकेपाठोपाठ नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी सातत्याने लावून धरली असून गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्यांना आश्वासित केले. त्याबाबतचे आदेश दिल्याने नवी मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
Navi Mumbai, Re-survey, constructions ,
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण, सिडको मंडळाकडून सर्वेक्षणासाठी ५५ कोटी रुपये खर्च
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
PCMC Organise We the People of India Event
पिंपरी : भारतीय राज्यघटनेला महापालिकेने दिलेल्या महामानवंदनेची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे नवी मुंबईतील लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. शहरातील जवळजवळ दोन लाख घरे ही ५०० चौरस फुटांपर्यंतची असून त्यांच्या मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या अंदाजे २५ कोटींच्या रकमेचा फरक पडणार आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : मैत्रिणीची हत्या केल्यानंतर स्वत: खाडीत उडी घेऊन आत्महत्या, युवकाचा मृतदेह सापडला

नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मालमत्ता करमाफी आणि मालमत्ता कर सवलतीचा ठराव १९ जुलै २०१९ रोजी नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. याअंतर्गत ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफी देण्याचा निर्णय झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या लाखो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. -गणेश नाईक, आमदार, ऐरोली विधानसभा

Story img Loader