पनवेल : राज्यात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारे लघुसंदेश समाजमाध्यमांवर पसरवून दंगल सदृष्य स्थिती निर्माण केली जात असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याअंतर्गत शांतता कमिटीच्या बैठका घेण्याच्या सूचना केल्या. गुरुवारी ठरल्याप्रमाणे शांतता कमिटीमधील सदस्यांसोबत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले होते. परंतु या बैठकीत थेट पोलिसांच्या चिरिमिरीमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात आल्याने उपस्थित पोलीस चक्रावले.

समाजात विविध जाती धर्मांच्या नागरिकांनी सलोख्याने रहावे या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता कमिटी तसेच मोहल्ला कमिटीच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. गुरुवारी ठरल्याप्रमाणे शहरातील क्राऊन सभागृहात बैठक सुरू झाली. पोलिसांनी नागरिकांना ज्यावेळी त्यांची मते मांडण्यासाठी संधी दिली. त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारीने पोलीस दलाचे सुरुवातीला कौतुक केले. मात्र कळंबोली सर्कलला पोलीस कर्मचारी वाहने थांबवून चिरिमिरी घेत असल्याचा आरोप केला.

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
Crime Branch and Vitthalwadi Police arrested two Bangladeshis in Ulhasnagar news
उल्हासनगरात आणखी दोन बांगलादेशी पकडले,गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

हेही वाचा – बुलढाणा : लोंबकळणाऱ्या तारा ठरल्या प्राणघातक; मशागत करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

उपायुक्त डहाणे यांच्यासमोर पोलिसांवर जाहीर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ होती. पोलीस अधिकारी चांगले आहेत, मात्र पोलीस कर्मचारी कारवाईचा बडगा रस्त्यावर धावणाऱ्या वाहनचालकांवर उगारतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस उपायुक्त डहाणे यांनी या बैठकीत नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे असे सांगताना समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या अफवांमुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.

Story img Loader