नवी मुंबई– नवी मुंबई- भारताने चंद्रावरील अद्यावत माहिती घेण्यासाठी सोडलेले चंद्रयान याची देशभरातील नागरिकांना मोठी उत्सुकता आहे. चंद्र यांची मोहीम यशस्वी होत असताना हे चंद्रयान महाराष्ट्रात सोडले असते तर बर झाले असते रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा खर्च वाचला असता अशी उपहार उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.  

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेकडून आंदोलनाची हाक; राज ठाकरे म्हणाले, “असं आंदोलन उभारा की…”

land acquisition news
वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला परस्पर वळवला; आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फसवणूक, गुन्हा दाखल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis
Maharashtra News Updates : आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार भाषण, सुरेश धस यांना दिली भगीरथाची उपमा
mumbai financial fraud cases pune crime news
Mumbai Crime News: वर्षभरात मुंबईकरांची झाली सर्वाधिक आर्थिक फसवणूक, पुणेकर दुसऱ्या क्रमांकावर; वाचा इतर शहरांत काय स्थिती?
mumbai dumpyard
मुंबई : देवनार कचराभूमी परिसरातील ३९ दिव्यांच्या खांबांची चोरी
gang created terror in Panmala area on Sinhagad Road
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
Panvel Marathi Conflict
Panvel Marathi Conflict : “मराठी माणसाची हिरानंदानीमध्ये राहायची लायकी नाही”, पनवेलमध्ये मराठी कुटुंबाला घर रिकामी करण्यास दबाव; मनसेकडून खळखट्याक!
shivsena leader sanjay raut
पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढलं पाहिजे – संजय राऊत

राज्यभरात रस्त्यांची दुरवस्था व त्यातच सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई व महामार्गावरील निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकारवर ही टीका केली आहे, आता तुम्ही रस्ता दुरुस्त कराल, पण मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांचे काय. यावर्षी गणपतीत कोकणातील चाकरमान्यांनी जायचं कसं, कोकणात जाण्यासाठी यू टर्न घ्यावा लागतो, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे.

हेही वाचा >>> “जे खोके खोके ओरडत होते त्यांच्याकडे कंटनेर्स, त्यांनी तर करोना…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबईवरून निघाल्यानंतर पनवेल पळस्पे मार्गे कोकणाकडे जाणारा रस्ता त्याची मात्र सतरा वर्षापासून वाट लागलेली आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या  चाकरमान्याना मुंबईवरून पुणे सातारा त्यानंतर यू  टर्न घेऊन पुन्हा कोकणाकडे जावे लागते . परंतु सरकारला त्याचे काही देणे घेणे नाही. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मी भाजपा समवेत गेलो असल्याच्या गप्पा अजितदादा मारत आहेत हे दुर्दैव आहे मी शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेलंच नाही त्या गाडीत मी नव्हतोच अशी उत्तरे दिली जातात त्यामुळे सध्या महाराष्ट्रात निर्लज्जपणाचे राजकारण सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी आजच्या निर्धारित मेळाव्यात केली.

Story img Loader