लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : जेएनपीटी बंदर,द्रोणागिरी आणि उरण मधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या कंटेनरच्या धडकेत मागील वर्षी ९ महिन्यात २५ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. रस्त्यावरील या यमदूत रुपी कंटेनरना आणखी किती बळी हवेत असा सवाल आता येथील वाहन चालक व जनतेकडून केला जात आहे. कारण यातील बहुतांशी अपघात हे रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बेकायदा कंटेनर वाहनांमुळे झाले आहेत. किंवा भरधाव कंटेनर वाहनाने धडक दिल्याने झाली आहेत.

tigress choti tara seen with her two cubs in Tadoba Andhari tiger project
भांडण की दंगामस्ती! ताडोबातील ‘छोटी तारा’ पाठोपाठ आता तिचे बछडेही…
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
in dombivli police action against vendor using gas cylinders to sell puris on road
डोंबिवलीत रस्त्यावर गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई
Women molested by scrap sellers in Sagaon Dombivli
डोंबिवलीत सागावमध्ये भंगार विक्रेत्यांकडून महिलांची छेडछाड
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Chhota Dadiyal tiger, Moharli, Tadoba-Andhari tiger,
Video : माझं जंगल, माझं राज्य… ‘या’ वाघाने थेट रस्त्यालगतच मांडले ठाण; मग दाढी कुरवळत…
Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
Action on encroachments in development plan near Durgadi Fort in Kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे

जेएनपीटी बंदरातील मालाची ने आण करणारी दहा हजारांहून अधिक कंटेनर वाहने दररोज उरण मधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करीत आहेत. या कंटेनर वाहनांच्या बेदरकारीमुळे ३३ वर्षात शेकडो दुचाकीस्वाराना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे तर सध्या रस्ता रुंदीकरणा नंतर जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पळस्पे या दोन्ही मार्गावर बेकायदा उभी करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : दिवाळीतील वाहतूक कोंडीवर उपायांचे प्रयत्न

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते किल्ला (नवी मुंबई) व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय मार्गावर उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक व गावांना जोडणाऱ्या सेवा(सर्व्हिस) मार्गाची उरणारणी करण्यात आली आहे.मात्र ही सेवा मार्गच कंटेनर वाहनामुळे वाहनतळ झाली आहेत. त्यामुळे प्रवासी व दुचाकी वाहने मुख्य मार्गाचा वापर करीत आहेत. याचा फटका या वाहनांना बसून अपघातात वाढ झाली आहे. या कंटनेर रुपी यमदूतानी आता पर्यंत उरण मधील सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ही बळी घेतले आहेत. त्यामुळे या यमदूताना आणखी किती बळी हवेत असा प्रश्न केला जात आहे.

उरण मधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील सेवा( सर्व्हिस)मार्ग सुरू करण्याची मागणी उरण मधील नागरिकांच्या वतीने वारंवार करून ही ती सुरू केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.