पनवेल : भारतीय रेल्वे महामंडळाचा ढीम्म कारभाराचा फटका ऐन गणेशोत्सवात कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता पनवेल रेल्वेस्थानकात येणारी सावंतवाडी स्पेशल एक्सप्रेस शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना तब्बल आठ तास स्थानकात ताटकळत बसावे लागले.

रेल्वे मंडळाच्या सूचना देणाऱ्या उदघोषणा विभागातील कर्मचारीसुद्धा नेमकी किती वाजेपर्यंत एक्सप्रेस येईल याची निश्चित माहिती देऊ न शकल्याने रेल्वे मंडळाचा पुन्हा एकदा बेभरवशाच्या कारभाराचा सामना प्रवाशांना करावा लागला.

Tharla Tar Mag Time Slot Change
‘ठरलं तर मग’ मालिकेची वेळ बदलली! ‘स्टार प्रवाह’वर १० फेब्रुवारीपासून होतील ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mahabhishek of Sunrays to Dagdusheth Halwai Ganapati Pune print news
नेमके काय घडले शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक 
Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
Metro service for cricket fans in Nagpur till 11.30 pm on 6th february
नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री ११.३० पर्यंत
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश

हेही वाचा – माहिती अधिकार फलकासाठी भीक मांगो आंदोलन

गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी हजारो चाकरमानी मुंबईतून कोकणात दाखल होतात. तिकीट भाडे स्वस्त आणि सामानासह प्रवास करता येतो त्यामुळे चार महिन्यांपूर्वी रेल्वे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले जाते. मात्र प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात होते त्यावेळेस रेल्वेच्या अनिश्चित कारभाराचा अनुभव मिळतो. पनवेल रेल्वेस्थानकात शुक्रवारी मध्यरात्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सावंतवाडीला जाणारी स्पेशल एक्सप्रेस रेल्वे सकाळी सव्वाआठ वाजता आली. यामुळे प्रवाशांना सात तास स्थानकात ताटकळत बसावे लागले. नेमका खोळंबा कशामुळे झाला याचे उत्तर प्रवाशांना स्थानकात न दिल्याने प्रवासी संतापले होते. शुक्रवारी दुपारी ही एक्सप्रेस कोकणात कणकवली स्थानकात पोहोचणार होती. मात्र सकाळी सव्वा आठ वाजता या रेल्वेचा प्रवास पनवेलमधून सुरू झाल्याने चाकरमानी कोकणात पोहोचण्यासाठी अजून आठ तासांचा विलंब लागणार आहे.

हेही वाचा – ऐन गणेशोत्सवाच्या तयारीत गव्हाण ते खारपाडा मार्गावर कोंडी; चार ते पाच तासांपासून नागरिक कोंडीत अडकले

ऐन गणेशोत्सव काळात रेल्वेला रात्रीचा शटडाऊन घेण्याचे नियोजन दिल्लीत बसलेले अधिकारी करत असतील तर ते धन्य आहेत. राज्यातील नेत्यांना सामान्यांवर या निर्णयामुळे काय आपबीती झाली याची कल्पना नाही. कोकणी माणसांकडून मतांची अपेक्षा ठेवायची आणि वर्षातून एकदा येणाऱ्या उत्सवासाठी सोय होत नसेल तर धर्माचे सरकार निवडून दिल्याचा काही लाभ झाला नाही. गावी जाण्यासाठी चार महिन्यांपूर्वी तिकीट बुकींग करूनही ऐनवेळी आठ – आठ तास पनवेल स्थानकात ताटकळत रहावे लागले. नेमकी कधी एक्सप्रेस येणार याची माहिती घोषणा देणाऱ्यांकडे नाही. वेटिंग रूममध्ये बालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्याची क्षमता आहे का याची तरी सोय केली पाहिजे. विज्ञानाच्या आधुनिक युगात आपण चंद्रावर पोहोचलोय मात्र रेल्वे कुठे थांबली कधी येईल याची माहिती मिळत नसेल तर हा असा कारभार करणाऱ्यांना गणराया बुद्धी देवो. गणेशोत्सवासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. या दिवसांमध्ये रात्रीचे शटडाऊन बंद करण्याची बुद्धी या अधिकाऱ्यांना देवाने देवो. – कृष्णा सावंत, सिंधुदुर्ग शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ, कळंबोली

Story img Loader