लोकसत्ता टीम

उरण : रविवारचा सुट्टीचा दिवस साधत सध्या उरण तालुक्यातील अनेक गावातील भातशेतीच्या कापणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा भरवसा नसल्याने कापणी आणि मळणी एकाचवेळी शेतात उरकून भात घरी नेले जात आहे. शेतात आलेलं पीक हाती लागावं यासाठी उरण मधील शेतकऱ्यांची ही लगबग सुरू झाली आहे.

vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
 honesty of the farmer who garlanded Nitesh Rane with onions Malegaon news
नितेश राणे यांना कांद्याची माळ घालणाऱ्या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी

साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात भात पिके तयार होतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भात पिकांची कापणी सुरू केली जाते. भाताचे हे कापलेले पीक शेतात ठेवलं जातं. याकाळात हे पीक उन्हात सुकत आणि त्यानंतर या पिकांची एकत्रित साठवण करून त्याची त्यानंतर दिवाळी किंवा त्यापुढे सवडीने मळणी केली जाते.

आणखी वाचा-उरण : गरजेपोटी घरांसाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात

मात्र सध्या पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेले भात पीक गमवावे लागत आहे. यावर्षी तर परतीचा पाऊस कधी येईल याची शाश्वती नाही. तसेच हल्ली वर्षभरात कधी आणि कोणत्याही वेळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी हा मार्ग निवडला आहे. त्यातच शेतीचा वाढता खर्च,मजुरांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांनी मधला मार्ग शोधला आहे. यात पीक कापून ते तातडीने शेतातच तात्पुरता खळा तयार करून झोडून,पाखरून पिशवीत भरून घरी नेला जात आहे. त्यानंतर घरी हे भात पुन्हा उन्हात वाळत घातलं जात. त्यामुळे पिकांचे किमान नुकसान होत नसल्याची माहिती कमलाकर पाटील या शेतकऱ्यांनी दिली आहे.

Story img Loader