नवी मुंबई : मुंबईत प्रवेश करताना एकच पथकर असावा याबाबत भाजप विचार करीत आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे लोकसभा संयोजक विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. ठाणे लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पक्षाचा जाहीरनामा हा त्या भागातील नागरिकांच्या अपेक्षानुसार तयार करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. या बाबतची माहिती सहस्राबुद्धे यावेळी दिली. नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले.

Discrimination by Mumbai Municipal Corporation,
वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
avinash jadhav bjp
टोलमुक्तीनंतर श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Constituencies in Nashik Division Delicate'for Grand Alliance
नाशिक विभागातीलं १६ मतदारसंघ महायुतीसाठी ‘नाजूक’ ; भाजपचा अभ्यासातील निष्कर्ष

हेही वाचा >>> Flamingo City: नवी मुंबई फ्लेंमिंगो सिटी होतेय पण त्यामागचं कटू वास्तव माहितीये का?

मुंबईत प्रवेश करण्यासाठी अनेक पथकर भरावे लागतात. यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला येतात़ त्याचबरोबर पासाळ्यातील चार महिने खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पथकरातून दिलासा मिळेल का, असा प्रश्न सहस्त्रबुद्धे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा धोरणात्मक विषय असल्याचे सांगितले. तसेच सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे मान्य करीत मुंबई प्राधिकरणासाठी एकाच पथकर असावा याबाबत भाजप गांभीर्याने विचार करीत असल्याचे सांगितले.

प्रकल्पांच्या उद्घाटनाबाबत मौन

भाजप लोकांसाठी झटणारा पक्ष असून लोकांच्या सुविधेसाठी प्रयत्नशील असल्याचे सहस्राबुद्धे यांनी सांगितले. त्यावेळी अनेक प्रकल्प केवळ उद्घाटनाअभावी रखडले असल्याचे सहस्राबुद्धे यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणले. त्यानंतर सहस्रबुद्धे कुठलेच उत्तर दिले नाही. तसेच पत्रकार परिषद आटोपती घेतली.