अनंत चतुर्दशी निमित्ताने आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला बाजार सुरू ठेवण्यात आलेला होता,मात्र बाजारात ग्राहक नसल्याने ६०% ते ७०% शेतमालाला उठाव नाही. त्यामुळे भाज्यांचे दर १०रुपये ते २० रुपयांनी गडगडले आहेत.आज अनंत चतुर्दशी निमित्ताने कांदा बटाटा, फळ, धान्य आणि मसाला हे चार बाजार पूर्णतः बंद ठेवण्यात आलेले आहेत. परंतु एपीएमसी भाजीपाला बाजार हा पहाटे २ पासून सुरू होतो तर सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत बहुतांश शेतमाल विक्री होतो. तसेच भाजीपाला हा जीवनावश्यक असल्याने सुरू ठेवण्यात आलेला होता. मात्र नित्याची भाजीपाला बाजारात असणारी वर्दळ, खरेदी- विक्री , आज बाजारात ग्राहक फिरकले नसल्याने मंदावली होती. त्यामुळे बाजारात काल आणि आजच्या बऱ्याच भाज्या शिल्लक राहिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा