पनवेल: तालुक्यातील भाताण व कसळखंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाहतूक कोंडीमुळे येथील अमेठी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. या शैक्षणिक संकुलाला सात वर्षे झाली असून येथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अरुंद रस्ते, वाहनचालकांची बेशिस्त आणि वाहतूक पोलिसांनी गैरहजेरीमुळे विद्यार्थी, पालकांना दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.

या शैक्षणिक संकुलात येणारे अनेक विद्यार्थी पनवेल व नजीकच्या परिसरात राहतात. तसेच मुंबई, नवी मुंबईसह पनवेल तालुक्यातील विविध वसाहतींमधून असंख्य विद्यार्थी येथे येतात. यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे वर्ग सोमवारपासून सुरू झाल्याने, तसेच सकाळी नऊ वाजण्याची वेळ गाठायची असल्याने अनेक विद्यार्थी व पालकांची वाहने सकाळी आठ वाजल्यापासून खोपोली- पनवेल महामार्गावरील आजिवली गावाच्या मार्गापासून महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात होते. यामध्ये महाविद्यालयात यापूर्वी शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची खासगी वाहने व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक वाहनांचा समावेश होता.

state boards 12th exams began today students facing traffic jams due to development work
बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडला हा प्रकार, इंग्रजीच्या पेपरला उपराजधानितील विद्यार्थी…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
stress-related suicide in students news in marathi
अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Noida Schools Bomb Threat
शाळेत जायचा कंटाळा आला म्हणून शाळेलाच बॉम्बने उडविण्याची दिली धमकी; नववीच्या विद्यार्थ्याला अटक
dividers closed Shilphata road Students parents trouble
शिळफाटा रस्त्यावरील दुभाजक बंद केल्याने विद्यार्थी, पालकांना फेरफटका
CBD sixth year old boy killed road accident collision with dumper
सीबीडी येथे डंपरने दिलेल्या धडकेत सहावीचा चिमुरडा ठार, चालक फरार
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Bike Rider Teach Lesson To Bus Driver
‘म्हणून शिक्षण महत्वाचे…’ रस्त्याच्या मधोमध थांबून त्याने बस चालकाला घडवली अद्दल; हाताची घडी घातली अन्… पाहा VIDEO चा शेवट

सूमारे तीनशे वाहने सकाळी साडेआठपर्यंतच्या सत्रात पोहचली होती, शिवाय तीनशेहून अधिक वाहनांची कोंडी या मार्गावर होती. शिवाजीनगर व आष्टेगावालगतचा अरुंद पुलावरून एकेरी वाहतुकीसह गावातील अरुंद रस्त्याचा सामना वाहनचालकांना करावा लागला. महाविद्यालय प्रशासनाने तीन कर्मचारी वाहतूक नियमनासाठी उभे केले होते, मात्र हे मनुष्यबळ तोकडे पडले होते. अनेक विद्यार्थी कोंडीत अडकल्याने पालकांसोबत पहिल्या दिवसाचा वर्ग वेळेत गाठण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागली. पहिलाच दिवस असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी लागली तयारी केली होती, मात्र वाहतूक कोंडीतून पायपीट करावी लागल्याने अनेकांना घामाघूम व्हावे लागले. या कोंडीमुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.  

महाविद्यालयाच्या वतीने मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरणाकडे, यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरून सेवा रस्त्याची मागणी केली आहे. गेल्या चार वर्षांत या प्रस्तावावर कार्यवाही झाली नसली तरी आमचा पाठपुरावा सुरूच आहे. पुढच्या वर्षांपर्यंत तरी ही मार्गिका होईल अशी अपेक्षा आहे. सोमवारी फक्त महाविद्यालय सुरू होणार होते. त्यामुळे पालक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहने घेऊन येतील अशी कल्पना नसल्याने वाहतूक पोलिसांना याबाबत कळविण्यात आले नव्हते.  – एच. एस. व्यास, रजिस्ट्रार, अमेठी विद्यापीठ, पनवेल

Story img Loader