नवी मुंबई : एपीएमसीत परराज्यांतून आणि राज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात सध्या ३३ गाड्या एवढीच आवक होत असून दरात प्रतिकिलो २० रुपयांनी दरवाढ झाली आहे. आधी ४०-५० रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटोचे दर आता ७०-८० रुपयांवर पोहोचले आहेत.

वाशीतील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. घाऊक बाजारामध्येच ७०-८० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. मागील आठवड्यात किरकोळ बाजारात ८० रुपये प्रातिकिलो मिळणारे टोमॅटो १०० रु. प्रतिकिलोने विकले जात आहेत.

dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
CNG, CNG expensive pune, CNG Pimpri,
ऐन गणेशोत्सवात सीएनजी महागला! पुणे, पिंपरीतील बदललेले दर जाणून घ्या …
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
navi mumbai,koparkhairane,footpath repairing started,
कोपरखैरणेत पदपथांची दुरुस्ती अखेर सुरू, सेक्टर १९ येथील मोठ्या खड्ड्यांमुळे पदपथ दोरी बांधून वापरासाठी बंद
Navi Mumbai, price garlic,
नवी मुंबई : लसणाच्या दरात तेजी, घाऊक बाजारात प्रतिकिलो ४०० रुपयांवर
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

हेही वाचा >>> लाडकी बहीण योजनेसाठी पनवेल पालिकेचे तीन फिरते मदत कक्ष

बंगळूरुमधून होणारी टोमॅटोची आवक पूर्णत: बंद असून नाशिक, सांगली येथील आवक असून कमी माल दाखल होत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक कमी झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

एपीएमसी बाजारात बुधवारी अवघ्या ३३ गाड्याच दाखल झाल्या असून १८०४ क्विंटल टोमॅटो आवक झाली आहे. निम्मीच आवक झाल्याने टोमॅटोच्या दराने उसळी घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील किरकोळ भाज्यांचे दर चांगलेच कडाडले असून त्यात आता टोमॅटोही महाग होत आहे.

एपीएमसी बाजारात पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत आहे. बाजारात केवळ महाराष्ट्रातून टोमॅटो दाखल होत आहेत. ५० टक्के आवक घटली आहे. त्यामुळे दर वधारले आहेत. – लक्ष्मण पानसरे, व्यापारी, एपीएमसी