खोपटे खाडीपूल व गव्हाण दिघोडे मार्गावरील जड कंटनेर वाहनांमुळे येथील नागरिकांना तासन्तासनाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या सातत्याने होणाऱ्या कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. उरण तालुक्यातील खोपटे पूल हा येथील पूर्व विभागातील नागरिकांच्या प्रवासाचा महत्वाचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरील जड कंटनेर वाहनांमुळे पुलावर आणि खोपटे परिसरात रस्त्यावर होणारी कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: दुर्लक्ष झाकण्यासाठी घाईघाईत स्मशानभूमीची रंगरंगोटी; पालिकेच्या नेरूळमधील कारभाराचा नमुना

Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
palghar highway potholes marathi news
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा
Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप
Mumbai Rain | Maharashtra Rain| Mumbai Rain Updates,
मुसळधार पाऊस, दोन तास लोकल खोळंबली; महिला प्रवाशांनी कुठे उरकायचा नैसर्गिक विधी?
modiji advertisements in local train
‘मोदीजींची जाहिरात बंद करा’, लोकलमधील मोठ्या आवाजातील जाहिरातींमुळे प्रवाशांना त्रास
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
During Ganeshotsav period technical failure on Central and Western Railways, late arrival of local trains increased Mumbai news
लोकल विलंबाचे विघ्न दूर होईना; सलग तीन दिवस मुंबईकरांचा प्रवास खोळंबला

सोमवारी सायंकाळी ४ ते ७ अशी चार तास पुलावर कोंडी झाल्याने शेकडो प्रवाशांना या कोंडीत अडकून पडावे लागले होते. तर गव्हाण फाटा ते दिघोडे चिरनेर मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. उरण मधील जेएनपीटी बंदरावर आधारित मालाची साठवणूक करण्यासाठी शेकडो गोदाम आहेत. या गोदामात ये जा करणाऱ्या हजारो कंटनेर वाहनांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. बेशिस्त वाहतूक आणि गोदामात वाहनतळाचा अभाव यामुळे कोंडीत भर पडली आहे. उरण मधील वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा कमी पडत आहे. यात सुरधारणा करण्याची आवश्यकता  असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक नियंत्रण करावी अशी मागणी खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी केली आहे.