नवी मुंबई – कायमस्वरुपी वर्दळीच्या असणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर आज रविवारी कळंबोली जवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर यशवंतराव चव्हाण मार्गाचा नामफलक लावण्यात येणार असल्याने कळंबोली येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे अधिकारी एन. व्ही. विश्वकार यांनी लोकसत्ताला दिली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर नामफलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे, पुण्याकडे जाणारी वाहतूक ही कळंबोली गेट नंबर ५ येथून देवांश हॉटेल, स्टील मार्केट येथून पुन्हा पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर येणार आहे. हे अंतर ५०० मीटर असणार आहे, त्यामुळे कमी वेळातच वाहन चालकांना पुन्हा एक्सप्रेस मार्गावर येता येणार असल्याने वाहतूक कोंडी होणार नसून, याबाबत योग्य नियोजन केल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी लोकसत्ताला दिली.

shilphata road update Nilaje railway bridge
Shilphata Traffic : निळजे रेल्वे पूल पुनर्बांधणीच्या कामाला प्रारंभ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
Mumbai carnac Railway Flyover marathi news
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
mahakumbh 2025 Guidlines
Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; चेंगराचेंगरीनंतर सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे!
Construction of Vadhavan Igatpuri highway to be handed over to NHAI Mumbai news
वाढवण-इगतपुरी महामार्गात निधीटंचाईचा ‘गतिरोधक’; संपूर्ण महामार्गच ‘एनएचएआय’कडे देण्याचा मुख्य सचिवांच्या बैठकीत सूर

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांकरिता नवी मुंबई महापालिकेचा ‘वेस्ट टू बेस्ट’ उपक्रम

हेही वाचा – शेती नष्ट होत असलेल्या उरणमध्ये एका गुंठ्यांत ९१ किलो भाताचे उत्पादन, चिरनेरच्या शेतकऱ्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन

दुपारी बारानंतर हे काम केव्हाही सुरू करण्यात येणार आहे. परंतु, कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी वाहतूक विभागाने घेतली आहे. दोन तास या कामाला लागण्याची शक्यता आहे. परंतु, पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नसून, फक्त वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी व वाहन चालकांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.

Story img Loader