निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघर येथील मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यासाठी लाखो जण भर उन्हात एकत्र आले होते. पण, उष्माघाताचा त्रास झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी कोण करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

Father daughter vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“एका बापाची घालमेल” लेकीची पाठवणी करताना वडील धायमोकलून रडले; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Tragic! Youth Dies After Falling From 3rd Floor While Filming Slow Motion Reel In UP's Agra
“एक चूक आई-वडिलांना कायमचं दु:ख देऊन जाईल” रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल
small boy did while bursting firecrackers
‘बाळा, आयुष्य खूप लहान आहे…’ फटाके फोडताना चिमुकल्याने केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही संतापले
Shocking video of Truck got stuck in pothole after arguing with cycling woman video goes viral
“गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही; VIDEO पाहून कळेल कर्माचं फळ म्हणजे नक्की काय
Pune road rage video goes viral 2 youth drive bike wrongly in front of ST bus watch video viral on social media
VIDEO: एवढी हिम्मत येतेच कुठून? पुण्यात एसटीसमोर तरुणांनी ओलांडली मार्यादा; बोला पुणेकर काय केलं पाहिजे यांचं?
Shocking video boat with 300 passengers sinks in river niger boat capsizes in nigeria viral video
VIDEO: किंकाळ्या, आक्रोश अन् क्षणात ३०० प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात पलटी; ‘टायटॅनिक’ सारखा भयंकर शेवट कॅमेऱ्यात कैद
Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या

हेही वाचा : उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?

उद्धव ठाकरे म्हणाले, “डॉक्टरांनी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाच्या चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागलं. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “शिंदे सरकारमध्ये माणुसकी राहिलेली नाही, मुख्यमंत्र्यांनी आता…”; खारघरमधील उष्माघाताच्या घटनेवरून नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

“मृतांचा योग्य आकडा समोर यायला हवा”

अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. परंतु, हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की करोनाचा कोणताही आकडा लपवायचा नाही. जे घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आत्ता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डी.वाय.पाटील, टाटा रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.