जलप्रवाशांची ताटकळ संपली

उरण : अलिबाग व उरणला जोडणाऱ्या करंजा खाडी किनाऱ्यावरून जलमार्गाने रेवस ते करंजा असा प्रवास करता येत असून दर एक तासांनी बोटसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. ही गैरसोय आता दूर झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सुरू केली आहे.

three baby vagathias brought from Kolhapur to sanjay gandhi national Park in borivali
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाटींचे आगमन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Satvya Mulichi Satvi Mulgi
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी व कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या…
Trent Boult unique record 1st player to win four T20 titles with four different teams of the Mumbai Indians franchise
Trent Boult Unique Record : ट्रेंट बोल्टने केला जगातील सर्वात अनोखा विक्रम, एकाच फ्रँचायझीच्या चार संघांसह नोंदवला खास पराक्रम
Ten new ST buses at Barshi depot Solapur
बार्शी आगारात दहा नवीन एसटी बस; आजी-माजी आमदारांत श्रेयाची लढाई
Tender for construction of sky walk along with Darshan Mandapam in Pandhari worth Rs 102 crore Solapur news
पंढरीत दर्शन मंडपासह स्काय वॉक उभारणीसाठी १०२ कोटींची निविदा
Changes in the recipes of meals served under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Amravati news
अमरावती : ‘गोडखिचडी’, ‘अंडापुलाव’साठी गुरूजींना मागावी लागणार माधुकरी!
Chandrapur District Bank Recruitment Inquiry Order
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीच्या चौकशीचे आदेश, सात दिवसात अहवाल…

अलिबाग व उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या  जलप्रवासासाठी मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने बोटीची सोय केलेली आहे. या मार्गातील २० मिनिटांच्या प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र दर तासानंतर ही सेवा असल्याने या दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तासभर ताटकळत राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना काही वेळा परतीच्या मार्गावर यावे लागत आहे. ही सेवा बारमाही सुरू असल्याने प्रवाशांना याचा फायदा होत असला तरी हा प्रवास धोकादायकही आहे, असे असतानाही दररोज हजारो प्रवाशी याच मार्गाचा वापर करीत आहेत. तर मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलसेवा पावसाळ्यात बंद केल्यानंतर याच मार्गाचा वापर करीत मुंबई ते अलिबाग असा प्रवास शेकडो प्रवासी करत असतात. त्यामुळे ही जलसेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.

याच मार्गावर रो रो सेवा सुरू करण्यात येणार असून त्यातील करंजा जेट्टीचे काम पूर्ण होत आले आहे. तर रेवस जेट्टीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करंजा रेवस खाडी पुलाचीही चाचपणी सुरू आहे. त्यामुळेच या मार्गाचे महत्त्व लक्षात येते. रेवस करंजा दरम्यान ही सेवा सुरू झाल्याने आम्हाला याचा फायदा होत असल्याचे मत या मार्गावरील प्रवासी आशीष घरत यांनी व्यक्त केले.

प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही. मधल्या वेळात ही बोट उपलब्ध होणार आहे.

ही सेवा नव्यानेच सुरू करण्यात आली असून १८ ते २० मिनिटात प्रवासी प्रवास करीत आहेत. या बोटीची क्षमता १० आहे. तसेच प्रवाशांना नेहमीची बोट चुकल्यानंतर या बोटीचा वापर करता येत असून पुढील काळात जादा प्रवासी क्षमता असलेल्या बोटी येणार आहेत.

-राहुल धायगुडे, बंदर निरीक्षक

Story img Loader