उरण : शेती हा व्यवसाय फायद्याचा करण्यासाठी निर्माण झालेल्या चिरनेरच्या महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाने दोन वनराई बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यामुळे पावसानंतरच्या शेत पिकांना पाण्याचा ओलावा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी उरणच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहकार्य केले. उरण मधील शेती संपुष्टात येत असतांना शेतकरी नवं नवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गाव पातळीवर पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवणे काळाची गरज असून, शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वनराई बंधारे वरदान ठरत आहेत. चिरनेर येथील महागणपती सेंद्रिय गटामार्फत आणि उरण तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ- नारनवर, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, श्री महागणपती सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषीसहाय्यक अधिकारी सुरज घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा