उरण : पाताळगंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या रसायनामुळे नदीतील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील दादर ते उरणच्या गोवठणे खाडीपर्यंत याचा परिणाम झाला आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक मासेमारीवर परिणाम झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून स्थानिक मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेने केली आहे.

पनवेल तालुक्यातील रसायनी परिसरातून अरबी समुद्राला पेण व उरण मार्गे मिळणाऱ्या या नदीच्या पाण्यामुळे तिन्ही तालुक्यांतील स्थानिक आणि मासेमारीवर अवलंबून असलेल्या हजारो मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

panvel agitation marathi news
एक जुलैपासून ‘नैना’विरोधी आंदोलन
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
swimming pool trainer woman molestation marathi news
पनवेल: तरणतलावाच्या प्रशिक्षकाकडून महिलेचा विनयभंग 
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
plastic, Panvel, plastic bags seized,
पनवेलमध्ये ३७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
Ghatkopar hoardings
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; होर्डिंगला परवानगी देणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन? अनोळखी खात्यातून व्यवहार

हेही वाचा – पनवेलमध्ये ३७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

मागील दोन दिवसांपासून पेण तालुक्यातील दादर खाडी परिसरात रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले आहेत. यामुळे पेण खारपाडा ते उरण गोवठणेपर्यंतच्या खाडीला याची झळ मासेमारी करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकास बसला आहे. या संदर्भात कोकण किनारा मच्छीमार संघटनेने मच्छीमारांना नुकसानभरपाई देऊन रसायनी पाताळगंगा येथील रासायनिक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या वेळी संघटनेचे सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्ष जयवंत तांडेल, कमिटी सदस्य विनोद पाटील, प्रदीप पाटील व हिरामण पाटील आदीजन उपस्थित होते.

रसायनयुक्त पाण्यामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील खाडीत माशांवर याचा परिणाम होत आहे. यामध्ये रसायनयुक्त कंटेनर धुतल्यावर पाणी खाडीत प्रवाहित केल्यानेही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र ही समस्या कायम आहे.

हेही वाचा – पाणीकपातीबाबत गणेश नाईकांची तीव्र नाराजी, जलसंपन्न नवी मुंबई शहरात पाणीकपात करणे पालिकेला भूषणावह नसल्याचे मत

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

जलप्रदूषणात वाढ झाली असताना याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत.