वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार,  शिमला मिरची,  हिरवी मिरची, फरसबी, कारली या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसत आहे. परिणामी एपीएमसीत उच्चतम दर्जाच्या भाज्या कमी असून त्याला जास्त मागणी आहे. तसेच सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने भाज्यांना मागणी आधीक आहे त्यामुळे भाज्यांच्या दरात १०-२०रुपयांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> महापालिकेची स्वच्छता मोहीमेनंतर दैनंदिन कचरा रस्त्यावर

Looting of farmers due to non guaranteed purchase Pune news
हमीभावाने खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट; जाणून घ्या, सोयाबीन, उडीद, मुगाला किती दर मिळतोय
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Increase in the price of tomato cabbage chillies Pune news
टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा
ex corporator demand compensation for jogeshwari residents for suffer heavy loss due to rain
अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Vegetables expensive pune, pitru pandharwada,
पितृपंधरवड्यात भाज्या महाग
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…

गेल्या काही दिवसांपासून  राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनाला बसत असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या दरात  वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी संतोष नवले यांनी दिली आहे. पितृपक्ष पंधरावडा देखील सुरू झाला आहे. त्यामुळे भाज्यांना अधिक मागणी वाढली आहे. मात्र भाज्यांच्या दर वाढीने गृहिणींची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. एपीएमसीत सोमवारी ६८७ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये टोमॅटो,कोबी, काकडी, भेंडी, वांगी या भाज्यांचे दर स्थिर आहेत तर हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार,  शिमला मिरची,  हिरवी मिरची, कारली , फरसबी या भाज्यांच्या दारांनी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात हिरवा वाटाणा  आधी १२०ते १३० रुपयांवरून आता १४०-१६० रुपयांवर तर गवार ४०-४५ रुवरून ६०-६५रुपयांवर , हिरवी मिरची ३३ ते ४० रुपयांवरून ४६ ते ४८ रु तर शिमला मिरची ४०ते ४५ रुपयांनी उपलब्ध असलेली  ६०रुपयांनी विकली जात आहे. तसेच आधी फ्लावर १५-२०रुपयांनी उपलब्ध होता तो आता २२-२४ रुपयांनी विकला जात तर कारली १८-२० रुपयांवरून  २२-२४ रुपयांनी आणि फरसबी ४०-४५रुवरून आता ६०-६५ रुपयांनीउपलब्ध आहे. तेच किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा १८०-२००रुपये किलो तर गवार, शिमला मिरची आणि फरसबी ८०रुपयांनी, कारली आणि फ्लॉवर ४०-५०रुपये तर हिरवी मिरची ६०-८०रुपये किलोने विक्री होत आहे.

घाऊक दर

भाजीपाला          आता           आधी

वाटाणा            १४०-१६०         १२०-१३०

गवार             ६०-६५          ४०-४५

कारली              २२-२४           १८-२०

हिरवी मिरची     ४६-४८          ३३-४०

शिमला           ६०             ४०-४५

फ्लॉवर         २२-२४           १५-२०

फरसबी         ६०-६५           ४५-५०